मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पवना जलवाहिनी प्रकल्पासंदर्भातील उच्चस्तरीय बैठकीत वरिष्ठ मंत्री आणि लोकप्रतिनिधींशी चर्चा करताना. महाराष्ट्र ताज्या बातम्या

शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करूनच पवना जलवाहिनी प्रकल्प राबविणार; २०५० पर्यंतच्या जलआराखड्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

पुणे-पिंपरी चिंचवडच्या भविष्यातील पाणीगरजा लक्षात घेऊन दीर्घकालीन नियोजनावर भर मुंबई : पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगर प्रदेशातील वाढत्या पाणीगरजा लक्षात घेऊन राज्य सरकारने पवना थेट समांतर जलवाहिनी प्रकल्पाबाबत महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली आहे. शेतकऱ्यांची संमती, विश्वास आणि संवादाशिवाय हा प्रकल्प पुढे नेला जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली. याचबरोबर, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांच्या २०५० पर्यंतच्या पाणीपुरवठ्याचा सर्वसमावेशक […]

विधानसभेत मुंबईच्या डिसॅलिनेशन प्रकल्पाबाबत माहिती देताना उद्योगमंत्री उदय सामंत. महाराष्ट्र ताज्या बातम्या

मुंबईच्या पाणीसुरक्षेसाठी ४,०७७ कोटींचा ‘डिसॅलिनेशन’ प्रकल्प; मनोरीत समुद्राच्या पाण्यापासून मिळणार गोडे पाणी

२०० एमएलडी क्षमतेचा प्रकल्प; ४८ महिन्यांत काम पूर्ण करण्याचे लक्ष्य मुंबई : मुंबईच्या वाढत्या पाणीगरजा आणि भविष्यातील जलसुरक्षेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले असून, पश्चिम उपनगरातील मालाड येथील मनोरी येथे ४,०७७ कोटी रुपयांचा २०० एमएलडी (दशलक्ष लिटर प्रतिदिन) क्षमतेचा समुद्राच्या पाण्याचे नि:क्षारीकरण (Desalination) प्रकल्प उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी विधानसभेत ही माहिती दिली. मुंबईला […]

विधान परिषदेत नवीन श्रमसंहितांबाबत माहिती देताना कामगार मंत्री आकाश फुंडकर. महाराष्ट्र ताज्या बातम्या

नवीन श्रमसंहितांमुळे कामगारांच्या हक्कांना अधिक बळ; राज्यात नियमावली अंतिम टप्प्यात

कामगार संघटनांशी व्यापक चर्चा करूनच अंतिम निर्णय; गिरणी व असंघटित कामगारांसाठीही महत्त्वाच्या घोषणा मुंबई : राज्यातील कामगारांना अधिक न्याय, सामाजिक सुरक्षा आणि सुरक्षित कार्यपरिसर उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने तयार केलेल्या चार नवीन श्रमसंहितांच्या (Labour Codes) अंमलबजावणीसाठी महाराष्ट्रात नियम तयार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी विधान परिषदेत दिली. नियम २६० अंतर्गत कामगार […]

Dr Anand Nadkarni during a public programme with social and political leaders महाराष्ट्र ताज्या बातम्या

आनंद देणारा हरपला : डॉ. आनंद नाडकर्णी यांना कपिल पाटील यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ, लेखक आणि सामाजिक भान जपणारे विचारवंत Anand Nadkarni यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक, वैचारिक आणि मानसिक आरोग्य क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. समाजवादी नेते Kapil Patil यांनी डॉ. नाडकर्णी यांच्या आठवणींना उजाळा देत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. “दुःख, चिंता आणि वैफल्याने ग्रासलेल्या हजारो कुटुंबांना नव्या आनंदाचा आधार देणारा माणूस हरपला,” अशा शब्दांत कपिल पाटील यांनी आपल्या भावना […]

Distraught groom sitting after an alleged marriage fraud incident, with wedding decorations and documents scattered in a rural Maharashtra setting महाराष्ट्र ताज्या बातम्या

तीन लाखांत नवरी… आणि नऊ लग्न; मराठवाड्यात विवाहाच्या नावाखाली फसवणुकीचे जाळे उघड

मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात घडलेले एक लग्न प्रकरण सध्या राज्यभर चर्चेत आहे. एका १९ वर्षीय तरुणीने वेगवेगळ्या नावांनी आणि मध्यस्थांच्या मदतीने तब्बल नऊ विवाह केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रत्येक वेळी विवाह जुळवून देण्याच्या नावाखाली वरपक्षाकडून दोन ते तीन लाख रुपये घेतले जात असल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर मराठवाड्यात विवाह जुळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या […]

New railway track nearing completion in rural Maharashtra, symbolizing long delayed infrastructure project महाराष्ट्र ताज्या बातम्या

३६ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अहिल्यानगर–बीड–परळी रेल्वेमार्ग पूर्णत्वाकडे

By डॉ अभयकुमार दांडगे  मराठवाड्यातील बहुप्रतिक्षित अहिल्यानगर–बीड–परळी रेल्वेमार्ग अखेर पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करत असून, तब्बल ३६ वर्षे प्रलंबित राहिलेला हा प्रकल्प आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या रेल्वेमार्गाच्या कामासाठी १५ मेची अंतिम मुदत देण्यात आली असून, मध्य रेल्वे, रेल्वे बोर्ड आणि जिल्हा प्रशासन या प्रकल्पाला गती देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मे अखेरपर्यंत उर्वरित कामे पूर्ण करून […]

Farmers working in early morning under intense summer heat in Marathwada, with cracked dry land and rising sun highlighting harsh drought conditions महाराष्ट्र ताज्या बातम्या

मराठवाड्यात उष्णतेचा कहर; विक्रमी तापमानात उष्माघाताने एकाचा मृत्यू

मराठवाड्यात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच उष्णतेचा तीव्र तडाखा बसू लागला असून, वाढत्या तापमानामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बीड जिल्ह्याचा देशातील सर्वाधिक उष्ण शहरांमध्ये समावेश झाल्याने परिस्थितीची गंभीरता अधोरेखित झाली आहे. दरम्यान, हिंगोली येथे उष्माघातामुळे ३० वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे, ज्यामुळे पुढील काळातील उष्णतेबाबत चिंता अधिक वाढली आहे. तापमानाचा विक्रम; मराठवाडा ‘हॉट झोन’ मराठवाड्यातील बहुतांश […]

Marathwada farmers standing in dry farmland with unsold banana bunches and onion sacks under stormy skies, showing crop distress and market failure. महाराष्ट्र ताज्या बातम्या

आखाती युद्धाचा फटका मराठवाड्याला; केळी-कांद्याला भाव घसरल्याने शेतकरी संकटात

आखाती देशांमध्ये पेटलेल्या संघर्षाची झळ आता थेट मराठवाड्यातील शेतकऱ्यांना बसू लागली आहे. केळी आणि कांद्याच्या निर्यातीवर परिणाम झाल्याने स्थानिक बाजारपेठेत दर कोसळले असून, शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले आहे. धाराशिव जिल्ह्यात एका शेतकऱ्याने कांदा पिकावर नांगर फिरवला, तर नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात केळीचे घड जनावरांना खाण्यासाठी टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. ही परिस्थिती मराठवाड्यातील शेती […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Budget Session: धान उत्पादकांना हेक्टरी २० हजार मदतीवर लवकर निर्णय: राज्यमंत्री कदम

मुंबई: राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रुपये मदत देण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संबंधितांची बैठक घेण्यात येईल. त्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर उचित निर्णय घेतला जाईल, असे Yogesh Kadam यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना स्पष्ट केले. भाजपचे ज्येष्ठ सदस्य Sudhir Mungantiwar यांनी पूर्व विदर्भातील धान उत्पादकांना बोनस देण्याच्या मुद्द्यावर विधानसभेत अत्यंत आक्रमकपणे लक्षवेधी सूचना […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाराष्ट्राला मिळणार सुमारे 1 लाख कोटी!

विकसित भारताकडे दमदार पाऊल : देवेंद्र फडणवीस मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्त्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा विकसित भारताकडे दमदार वाटचाल करणारा आहे. केंद्रीय करातून महाराष्ट्राला मिळणारा वाटा हा 98,306 कोटी रुपये इतका असणार आहे. याशिवाय अर्थसंकल्पाचे प्राथमिक आकलन करता, 12,355 कोटी विविध प्रकल्पांसाठी आहेत. त्यामुळे सुमारे 1 लाख कोटी महाराष्ट्राला […]