महाराष्ट्र ताज्या बातम्या

Assembly Session : केंद्राने मदतीची दखल घेतली; महाराष्ट्राला निश्चित मदत मिळेल — विधानसभेत अजित पवारांचे आश्वासन

ajit pawar

नागपूर – महाराष्ट्रातील कृषीक्षेत्रातील हानी आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अहवाल २७ नोव्हेंबर आणि १ डिसेंबर २०२५ रोजी केंद्र सरकारकडे पाठवला असून केंद्राने त्याची दखल घेतली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिली. 

पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना त्यांनी सांगितले की “केंद्राचे पहिले पाहणी पथक येऊन गेले आहे. दुसरे पथक १४ किंवा १५ डिसेंबरला येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय कृषिमंत्री यांनी महाराष्ट्राला निश्चित मदत दिली जाईल, असे आश्वासन दिले आहे.”

महसूल वने, कृषी, दुग्धव्यवसाय, मत्स्य, सार्वजनिक बांधकाम आदी विभागांच्या मागण्यांवरील एकत्रित उत्तरात पवार म्हणाले, पूरग्रस्तांसाठी पॅकेज, महात्मा फुले जनआरोग्य योजना, कुंभमेळा नियोजन यांसाठी तरतुदी करणे आवश्यक आहे.

त्यांनी पुढे स्पष्ट केले,  “येत्या वर्षात खर्चावर नियंत्रण आणि उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यावर भर राहील. वित्तीय शिस्त पाळून राजकोषीय तूट मर्यादित ठेवू. देशातील केवळ तीन राज्येच केंद्रीय निकषानुसार कर्जमर्यादेत आहेत — त्यात महाराष्ट्राचा समावेश आहे.”

चर्चेनंतर सभागृहाने ₹७५,२८६ कोटी ३७ लाख ५९ हजार रुपयांच्या पुरवणी मागण्यांना अनुमती दिली.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात