महाराष्ट्र ताज्या बातम्या

शिवसेनेची लांडगेतोड करणाऱ्याला बाळासाहेबांनी कधीच दारात उभं केलं नसतं – अंबादास दानवे

मुंबई – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नांदेडमधील सभेत “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हयात असते तर त्यांनी ऑपरेशन सिंदूरसाठी पंतप्रधान मोदींना गळाभेट दिली असती,” असे विधान केल्यानंतर राज्याचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

दानवे यांनी एका ट्वीटद्वारे म्हटले की, “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जर हयात असते, तर त्यांनी शिवसेनेची लांडगेतोड करणाऱ्याला कधीच दारात उभं केलं नसतं, गळाभेट तर फारच दूरची गोष्ट आहे.”

ते पुढे म्हणाले की, “धर्म विचारून हिंदूंचे प्राण घेणारे अतिरेकी कुठे आहेत, याचा सवाल बाळासाहेबांनी केला असता. संपूर्ण देश ऑपरेशन सिंदूरसाठी एकत्र उभा असताना पाकिस्तानसोबत शस्त्रसंधी जाहीर करण्यामागे कोणाचा दबाव होता, हे त्यांनी विचारले असते.”

मराठवाड्याच्या मुद्द्यावरूनही दानवे यांनी सरकारवर टीका केली.

दानवे यांनी अमित शहांच्या मराठवाड्यावर ‘विशेष प्रेम’ दाखवण्यावरही टीका करत म्हटले की, “मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेचा कागदांचा गठ्ठा राज्य सरकारने केंद्राकडे पाठवला असला तरी त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. भाजप गेली १० वर्षे कोकण व कृष्णा खोऱ्यातील पाणी मराठवाड्याला देण्याची भाषा करते आहे, पण अजून एक थेंबही आलेला नाही.”

दानवे पुढे म्हणाले की, “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे नाव घेऊन भाषण सुरू करणारे शाह हे विसरले की चिकलठाणा विमानतळाला संभाजी महाराजांचे नाव देण्याची फाईल केंद्रात अजूनही धूळ खात पडून आहे.”

दानवे यांच्या या टीकेनंतर राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी केंद्र सरकारवर व भाजपवर थेट आरोप करत कठोर प्रश्न उपस्थित केले आहेत.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात