महाराष्ट्र ताज्या बातम्या

“बाताश्री शेलार!” – बॅनरबाजीच्या माध्यमातून शिवसेनेचा आशिष शेलारांवर हल्लाबोल

मुंबई: मुंबईच्या बांद्रा परिसरात भाजप नेते व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या विरोधात शिवसेनेकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. “बाताश्री शेलार” असा उल्लेख असलेले हे बॅनर सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहेत.

शिवसेना नेते अखिल चित्रे यांच्या नेतृत्वाखाली लावण्यात आलेल्या या बॅनरांमध्ये शेलारांवर तिखट शब्दांत टीका करण्यात आली आहे. बॅनरवरील मजकूरात म्हटलं आहे – “अहो भाताचे शेलार, मुंबईकरांनी सध्याचे दार उघडून दिलं नव्हतं, तुम्ही लाथ मारून आत शिरलात. आणि आता पहिल्याच पावसात मुंबईकरांचा पाय गटारात आणि तुमच्या तोंडात माईकमध्ये!”

ही टीका शेलार यांनी नगरविकास विभागाकडे केलेल्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे. त्यांनी महाविकास आघाडीच्या कार्यकाळात मुंबई महानगरपालिकेने पावसाळ्यासंदर्भात हाती घेतलेल्या प्रकल्पांची श्वेतपत्रिका सादर करण्याची मागणी केली होती. यासोबतच मिठी नदी परिसरातील गाळ काढण्याच्या कामाचा अहवालही मागवला होता.

शेलारांच्या या मागण्यांनंतर शिवसेनेने त्यांच्या शैलीत प्रत्युत्तर दिलं असून, हे बॅनर केवळ राजकीय आरोपांपुरते मर्यादित न राहता सार्वजनिक चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहेत.

मुंबईतील स्थानिक राजकारणात यामुळे तापलेले वातावरण अधिकच गरम होण्याची शक्यता आहे. आता शेलार यांच्याकडून या टीकेला काय प्रत्युत्तर दिलं जातं, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात