महाराष्ट्र ताज्या बातम्या

त्रिभाषा धोरणावरून भाजपचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; आंदोलन म्हणजे ढोंग – नवनाथ बन

मुंबई: त्रिभाषा धोरणाविरोधात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उबाठा गट) मोर्चा काढत असतानाच भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी या आंदोलनावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी हे आंदोलन ढोंगी असून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रकार असल्याचा आरोप केला आहे.

ट्विट करताना बन म्हणाले, “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना, फेब्रुवारी २०२२ मध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या (NEP) टास्क फोर्सचा अहवाल अधिकृतपणे स्वीकारला गेला होता. त्या अहवालात स्पष्ट नमूद आहे की इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा धोरण लागू करावे आणि तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकवावी.”

“मग आता उबाठा गट नेमकं त्या धोरणाविरोधात का मोर्चा काढतोय? स्वतः घेतलेल्या निर्णयावर रडगाणं गाणं म्हणजे ढोंग नाही का?” असा सवाल करत बन यांनी आंदोलनाची खिल्ली उडवली.

“हे आंदोलन नाही, तर फक्त जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न आहे. सत्तेत असताना धोरण मंजूर करायचं, आणि बाहेर पडल्यानंतर ‘हिंदी सक्ती’चा मुद्दा उकरून काढायचा – ही उबाठांची स्टाईल आहे,” असंही ते म्हणाले.

उद्धव ठाकरेंवर टीका करताना बन यांनी विचारले, “उद्धवजी अजून किती युटर्न घेणार?”

राज्यातील भाषावादावरून राजकीय वातावरण तापले असताना, नवनाथ बन यांच्या या ट्विटने नव्या वादाला तोंड फोडले आहे. भाजपने यानिमित्ताने उबाठा गटाच्या भूमिकेतील विरोधाभास अधोरेखित करत, त्यांची विश्वासार्हताच प्रश्नात आणली आहे.

राज्यातील मुंबई महापालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या असताना, ‘हिंदी सक्ती’चा मुद्दा नव्याने राजकीय संघर्षाचे केंद्रबिंदू बनण्याची चिन्हे आहेत.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात