महाराष्ट्र ताज्या बातम्या

कापूस आयात शुल्क रद्द करण्याचा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांना मृत्युदंड – संयुक्त किसान मोर्चा

नवी दिल्ली – वित्त मंत्रालयाने कापूस आयातीवरील ११ टक्के शुल्क तसेच कृषी पायाभूत संरचना विकास उपकर (AIDC) रद्द करण्याची अधिसूचना जारी केली आहे. हा निर्णय आजपासून (१९ ऑगस्ट) लागू झाला असून ३० सप्टेंबरपर्यंत लागू राहणार आहे. सरकारने या निर्णयाला “सार्वजनिक हितासाठी आवश्यक” असे म्हटले आहे. परंतु, संयुक्त किसान मोर्चा (एसकेएम) ने या अधिसूचनेचा तीव्र निषेध […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Cabinet Decision: राज्यात अतिवृष्टी, सर्व यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मंत्रिमंडळ बैठकीत परिस्थितीचा आढावा, नुकसानीचे तातडीने पंचनामे मुंबई : – राज्यात अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रणासाठी सर्वच यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश दिले आहेत. जीवितहानी, पशूधन आणि घरांचे नुकसानीसाठी तातडीने मदतीसाठी अधिकारी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. शेतीच्या नुकसानीचेही (loss of crop) तातडीने पंचनामे करावेत आणि एनडीआरएफच्या (NDRF) निकषांप्रमाणे भरपाई देण्याबाबत कार्यवाहीचे निर्देश दिल्याचे मुख्यंत्री देवेंद्र […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Nathuram Godse : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना ‘नथुराम गोडसे’ची धमकी; जयंत पाटील, सुप्रिया सुळे, सत्यजीत तांबे यांचा सरकारवर हल्लाबोल

मुंबई : महाराष्ट्रातील संयमी व सुसंस्कृत राजकारणी म्हणून ओळखले जाणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना ‘तुमचा नथुराम गोडसे करू का?’ अशी धमकी एका तथाकथित कीर्तनकाराने व्हिडिओद्वारे दिली. या घटनेने संतपरंपरेच्या महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून विरोधी पक्ष नेत्यांनी सरकारला धारेवर धरले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) चे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

मनसेसोबतची युती शिवसेनेसाठी घातक ठरेल – किशोर तिवारींचे उघड पत्र

यवतमाळ: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत (मनसे) युती करू नये, अशी भूमिका अपदस्थ प्रवक्ते किशोर तिवारी यांनी घेतली आहे. यासाठी त्यांनी उद्धव ठाकरेंना एक उघड पत्र लिहून सावधगिरीचा इशारा दिला आहे. पत्रात तिवारींनी स्पष्ट केले आहे की, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून भाषावाद आणि प्रांतवादाच्या […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Poshan Ahar Scam: शालेय मुलांचा सरकारी तांदूळ आफ्रिकेत! — विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा महायुती सरकारवर थेट भ्रष्टाचाराचा आरोप

मुंबई : राज्यातील गरीब व अल्पभूधारक कुटुंबातील शालेय मुलांच्या ताटातील सरकारी तांदूळ थेट आफ्रिकन देशांत पोचतोय, आणि हे सरकार डोळेझाक करतेय का? असा थेट सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला आहे. “सरकारतर्फे कोणीही जबाबदार व्यक्ती पुढे यावी आणि माझ्याशी ‘भ्रष्टाचार पे चर्चा’ करावी, जागा आणि वेळ तुम्ही ठरवा!” अशा आव्हानात्मक शब्दांत […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Cabinet Decision: राज्याच्या पोलीस दलात १५ हजार पदांची ‘महाभरती’ — मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

मुंबई : राज्याच्या पोलीस दलात तब्बल १५ हजार पदांची भरती होणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे राज्यभरातील तरुणांसाठी ही संधी ‘सुवर्णसंधी’ ठरणार असल्याचे बोलले जात आहे. या भरतीत पोलीस शिपाई १०,९०८ पदे, चालक २३४, बॅण्डस् मॅन २५, सशस्त्री शिपाई २,३९३ आणि कारागृह शिपाई ५५४ […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

UBT Shiv Sena : बाळगोपाळांसाठी गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबीर — शिवसेना आणि रोटरी क्लबचा संयुक्त उपक्रम

बई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा क्रमांक १४ आणि रोटरी क्लब ऑफ बोरीवली यांच्या संयुक्त विद्यमाने ५ ते १६ वयोगटातील मुला-मुलींसाठी श्री गणेशमूर्ती घडविण्याचे प्रशिक्षण शिबीर रविवारी वैश्य समाज सभागृह, बोरीवली (पूर्व) येथे आयोजित करण्यात आले. या शिबिराला लहान मुला-मुलींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाला विभागप्रमुख उदेश पाटेकर, विभाग संघटिका सौ. शुभदा शिंदे, विधानसभा प्रमुख […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Cabinet Decision: रेशन दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ – मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई : राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना (अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब) अन्नधान्याचे वितरण करणाऱ्या रेशन दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. सध्या ई-पॉस मशीनद्वारे अन्नधान्य वितरणासाठी रेशन दुकानदारांना १५० […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Aadhaar : आधार चेहरा प्रमाणीकरण उपक्रमाने गाठला नवा विक्रम — केवळ सहा महिन्यांत 100 कोटींवरून 200 कोटी व्यवहारांचा टप्पा

मुंबई : येत्या स्वातंत्र्यदिनी कागदपत्रांपासून स्वातंत्र्य मिळवणे आता फक्त एका दृष्टीक्षेपावर शक्य झाले आहे. आधार चेहरा प्रमाणीकरणामुळे आधारधारकांना कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही वेळी, कोणत्याही कागदपत्राशिवाय — त्वरित आणि सुरक्षितपणे — आपली ओळख प्रमाणित करणे शक्य झाले आहे. सुरळीत, निर्धोक आणि कागदविरहित प्रमाणीकरणाच्या दिशेने भारताची जलद वाटचाल अधोरेखित करत, 10 ऑगस्ट 2025 रोजी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

हत्तीण, कबुतर, वाघ… महायुती सरकार ‘सर्कस’सारखे – प्रा. अनंत गाडगीळ यांचा उपरोध

मुंबई : कोल्हापूरच्या हत्तीणीचा प्रश्न, दादरच्या कबुतरांमुळे निर्माण झालेले प्रदूषण, आणि बांद्र्यातील वाघाच्या हालचाली—या साऱ्यांचे हाताळण करताना महायुती सरकारची अवस्था अक्षरशः ‘सर्कस’सारखी झाली आहे, अशी उपरोधिक टीका काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते आणि माजी आमदार प्रा. अनंत गाडगीळ यांनी केली आहे. प्रा. गाडगीळ म्हणाले, “सर्कशीत तारेवरची कसरत हे आकर्षण असते. कोल्हापूरच्या हत्तीणी आणि वनतारातील ‘अंबारी’ दोन्ही सांभाळताना […]