महाराष्ट्र ताज्या बातम्या

Shiv Sena: मतदार यादीत शुद्धता आणा, घुसखोरांची नावे वगळा – निवडणूक आयोगाकडे शिवसेनेची आग्रही मागणी

मुंबई : राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाने मतदार यादी शुद्ध करण्याची आणि बांग्लादेशी घुसखोरांची नावे वगळण्याची मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आज दिल्लीत केली.

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या शिष्टमंडळाने दिल्लीतील मुख्य निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार, तसेच आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

ठळक मागण्या: मतदार यादी थेट आधार क्रमांकासोबत जोडा, बांग्लादेशी घुसखोरांची नावे यादीतून वगळा, मतदान प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह करा

उदय सामंत यांनी स्पष्ट केले की, “मुंबईसारख्या महानगरांमध्ये बांग्लादेशी घुसखोरांची नावे मतदार यादीत आढळणे ही लोकशाहीसाठी गंभीर बाब आहे. निवडणूक आयोगाने या संदर्भात त्वरीत छाननी करून आवश्यक ती कारवाई करावी.”

या बैठकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक देश, एक निवडणूक’ या संकल्पनेलाही शिवसेनेने पुनः एकदा ठाम पाठिंबा दर्शवला. “एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना हीच खरी देशहिताची बाजू मांडणारी पार्टी आहे,” असे म्हणत सामंत यांनी आयोगाला पक्षाचा अधिकृत अभिप्राय सादर केला.

या भेटीनंतर काही माध्यमांत धनुष्यबाण चिन्हावरील न्यायालयीन खटल्यावर चर्चा झाली असल्याच्या बातम्या झळकल्या. मात्र उदय सामंत यांनी यावर स्पष्ट भाषेत प्रतिक्रिया देत ती अफवा फेटाळून लावली. “आम्ही न्यायप्रक्रियेवर आणि निवडणूक आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवर पूर्ण विश्वास ठेवतो,” असे ते म्हणाले.

शिष्टमंडळात उद्योगमंत्री उदय सामंत, मंत्री शंभूराज देसाई, खासदार मिलिंद देवरा आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांचा समावेश होता.

या बैठकीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात हलचालींना गती मिळाल्याचे दिसून येत असून, आगामी स्थानिक निवडणुकांपूर्वी मतदार यादींच्या शुद्धतेसाठी नव्या घडामोडी सुरू होण्याची चिन्हे आहेत.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात