महाराष्ट्र ताज्या बातम्या

बुरुड समाजातील बांबू कारागिरांना कच्चा माल उपलब्ध करणार; अडथळा आणणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई : वनमंत्री गणेश नाईक

मुंबई: राज्यातील बुरुड समाजातील बांबू कलाकार आणि कारागिरांना कच्चा माल उपलब्ध करण्यात अडथळे निर्माण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. तसेच या समाजातील युवकांना बांबू उत्पादनातून कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मंत्रिमंडळाची विशेष समिती नियुक्त करून धोरण तयार केले जाईल, असे स्पष्ट उत्तर वनमंत्री Ganesh Naik यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेला दिले.

ही लक्षवेधी सूचना सदस्य Rajkumar Badole यांनी मांडली होती. ज्येष्ठ काँग्रेस नेते Nana Patole यांनी बुरुड समाज पारंपरिकरित्या बांबू कारागिरी व्यवसायात कार्यरत असल्याचे सांगत, त्यांच्या उपजीविकेसाठी आवश्यक बांबू सहज उपलब्ध व्हावा, अशी मागणी केली. तसेच या व्यवसायाच्या प्रशिक्षणासाठी बुरुड समाजातील युवकांचीच निवड करण्याची मागणी त्यांनी केली.

सदस्य Kishor Zodgewar यांनी ग्रामीण भागात “बांबू ही सोन्याची कांडी” अशी म्हण प्रचलित असल्याचे सांगत, बुरुड समाजाचा पारंपरिक व्यवसाय टिकून राहण्यासाठी लाल व हिरवा बांबू उपलब्ध करून द्यावा आणि बांबू लागवडीसाठी जमीन उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली.

ज्येष्ठ नेते Vijay Wadettiwar यांनी हा विषय अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगत तज्ज्ञ समिती नेमण्याचा विचार आहे का, असा सवाल उपस्थित केला. तर Vinay Kore यांनी वनविभागाच्या अखत्यारीतील पडिक जमीन बांबू लागवडीसाठी उपलब्ध करून देण्याचा मुद्दा मांडला.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात