महाराष्ट्र ताज्या बातम्या

Chandrashekhar Bawankule : “यापुढे फेसॲपवर हजेरी नाही… तर पगारही नाही!” – महसूलमंत्री बावनकुळे यांचा कडक इशारा

मुंबई – राज्यातील महसूल यंत्रणेत शिस्त आणण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी कडक पवित्रा घेतला. “ज्या अधिकाऱ्यांनी फेसॲपवर उपस्थिती नोंदवली नाही, त्यांचा पगार थांबवण्यात येईल. ज्या दिवशी हजेरी नसेल, त्या दिवशी गैरहजर मानलं जाईल,” असा थेट इशारा त्यांनी दिला आहे.

या नव्या आदेशानुसार तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी ते जिल्हाधिकारी यांच्यासाठी फेसॲपवर दररोज हजेरी अनिवार्य करण्यात आली आहे. ज्या अधिकाऱ्यांची पोस्टिंग ज्या गावात आहे, तिथूनच हजेरी लावावी लागेल, अन्यथा ऑगस्टपासून पगार थांबवण्यात येईल, असा इशारा महसूलमंत्र्यांनी दिला.

बावनकुळे म्हणाले, “महसूल यंत्रणेत शिस्तबद्धता यावी आणि मनमानी गैरहजेरीला आळा बसेल, या हेतूनेच हा निर्णय घेतला आहे.” मात्र, पगार थांबवण्याच्या इशाऱ्यामुळे राज्यभरातील महसूल कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.

पावसाळ्यात आंदोलन नको – प्रहारच्या मागण्या मान्य

दरम्यान, प्रहार संघटनेच्या आंदोलनाबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले, “बच्चू कडूंसोबत चर्चा झाली असून त्यांच्यातील बहुतेक मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यात आंदोलन करू नका, सरकार तुमचं ऐकतंय.” दिव्यांग मानधन वाढ आणि कर्जमाफीसाठी एसओपी तयार करण्याचं काम सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

फेसॲप सक्तीमुळे महसूल यंत्रणा अधिक शिस्तबद्ध होईल की कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष वाढेल, याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात