महाराष्ट्र ताज्या बातम्या

Assembly Session : विधानसभेच्या विशेष बैठकीत गोंधळ: सहापैकी तीन लक्षवेधी रखडल्या; मंत्र्यांकडे उत्तर, पण सदस्यांकडे नाही!

नागपूर : विधीमंडळात लक्षवेधींसह अधिकाधिक कामकाज व्हावे यासाठी सकाळी १० वाजता घेतली जाणारी विशेष बैठक आज गोंधळात पार पडली. बुधवारी सभागृहासमोर एकूण पाच लक्षवेधी दाखल होत्या. १० वाजता प्रक्रिया सुरू झाली—पहिली लक्षवेधी पार पडली, दुसऱ्या वेळी संबंधित सदस्य अनुपस्थित असल्याने ती घेतली गेली नाही.

तिसरी लक्षवेधी अतिवृष्टीमुळे हानी झालेल्या २९ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांशी संबंधित—राज्यभरातील कृषी क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाची होती. शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याची संधी असताना आश्चर्यकारक प्रकार घडला.

या लक्षवेधीचे उत्तर तयार असलेला कागद मंत्र्यांकडे होता, परंतु लक्षवेधी विचारणारे सदस्य भास्कर जाधव यांच्याकडे मात्र उत्तराची प्रतच नव्हती. यामुळे सभागृहात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले.

यावर तीव्र नाराजी व्यक्त करत जाधव म्हणाले, “मंत्र्यांकडे उत्तर आणि सदस्यांकडे नसणे ही कोणती पद्धत?” सभागृहात उपस्थित असलेले ज्येष्ठ मंत्री उदय सामंत यांनीही जाधव यांच्या भावनेला साथ देत म्हटले,  “उत्तर नसणे किंवा उपलब्ध न देणे योग्य नाही.”

या गोंधळामुळे ही महत्त्वाची लक्षवेधी पुढे ढकलण्यात आली.

पाचवी लक्षवेधी ३२ गावांतील पूरस्थिती व जनजीवन विस्कळीत होण्याबाबत होती. परंतु संबंधित मंत्री सभागृहात उपस्थित नसल्याने तीही तालिकेत पुढे ढकलावी लागली. विशेष बैठक असूनही सहापैकी तीन लक्षवेधी न पार पडणे ही स्वतःमध्येच विशेष नोंद घेण्याजोगी बाब ठरली.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात