महाराष्ट्र ताज्या बातम्या

पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांचे अर्थसहाय्य : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत केली. यासोबतच, या हल्ल्यातील मृतांना मंत्रिमंडळ बैठकीत भावपूर्ण श्रद्धांजलीही अर्पण करण्यात आली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढे स्पष्ट केले की,राज्य सरकार मृतांच्या कुटुंबातील मुलांच्या शिक्षण आणि रोजगाराच्या संधींकडे विशेष लक्ष देईल.विशेषत: ज्या कुटुंबांमध्ये रोजगाराचा प्रश्न आहे, त्यांच्या थेट वारसांना शासकीय नोकरी देण्याचा निर्णय त्यांनी आपल्या विशेषाधिकारात जाहीर केला.यापूर्वीच, हल्ल्यातील मृतांपैकी एक असलेल्या जगदाळे यांच्या कुटुंबातील मुलीला नोकरी देण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी कालच केली होती.आता या निर्णयामुळे दहशतवादी हल्ल्यातील पीडित कुटुंबांना आर्थिक आणि सामाजिक आधार मिळण्यास मदत होईल,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात