महाराष्ट्र

गुटखा विक्रेत्यांवरही मकोका लागू; कायदा अधिक कठोर करण्याची मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

नागपूर – राज्यात गुटखा विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाईसाठी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) लागू करण्यासाठी आवश्यक दुरुस्त्या करण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत केली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गुटखा विक्री करणाऱ्यांवर मकोका लागू करण्याचा प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे पाठवला होता. परंतु सध्याच्या कायद्यातील “हार्म आणि हर्ट” या दोन आवश्यक घटकांचा अभाव असल्याने मकोका लागू करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नव्हते. या तरतुदींमध्ये बदल करून गुटखा व्यवसायिकांवर मकोका लागू करता येईल, अशा दुरुस्त्या लवकरच करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

शाळा–महाविद्यालय परिसरातील विक्रेत्यांवर संयुक्त कारवाई

आमदार प्रशांत ठाकूर, अस्लम शेख, अभिमन्यू पवार, रईस शेख आणि अमीन पटेल यांनी शाळा–महाविद्यालय परिसरात अवैध गुटखा विक्री व वहनावर प्रश्न उपस्थित केला होता.

राज्यात गुटखा बंदी असूनही पोलिसांनी व्यापक मोहीम राबवून मोठ्या प्रमाणावर गुन्हे नोंदवले आहेत. विविध जिल्ह्यांतील कारवाई अशी: नवी मुंबई – 1,114, अहिल्यानगर – 185, जालना – 90, अकोला – 35, नाशिक – 131, चंद्रपूर – 230, सोलापूर – 108, बुलढाणा – 664 नागपूर व यवतमाळ – 1,706

शाळा किंवा महाविद्यालयाच्या १०० मीटर परिसरात गुटखा विक्री आढळल्यास टपऱ्या व दुकानांवर संयुक्त कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले असून, ही कारवाई स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समन्वयाने होणार आहे.

मुंबई महानगरात दर्जेदार पुनर्वसन केंद्रांची कमतरता असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्य केले. ड्रग्जच्या आहारी गेलेल्या व्यक्तींसाठी प्रभावी पुनर्वसन केंद्र उभारण्यासाठी सरकार आवश्यक पावले उचलणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात