ताज्या बातम्या महाराष्ट्र

राज्यातील सर्वेक्षण प्राधान्याने व वेळेत पूर्ण करा : राधाकृष्ण विखे पाटील

X : @therajkaran

मुंबई

मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने राज्य मागासवर्गीय आयोगाच्यावतीने राज्यभरात राबविली जाणारी सर्वेक्षण मोहीम प्राधान्याने व वेळेत पूर्ण करण्याबाबतचे निर्देश राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना दिले. मंत्रालयात महसूल विभागाची महत्वाची बैठक पार पडली, यावेळी ते बोलत होते.

मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने राज्य मागासवर्गीय आयोग राज्यभरातील कुटुंबागणिक महत्त्वाची माहिती संकलित करण्यात येत आहे. याबाबत विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उप विभागीय अधिकारी, तहसिलदार तसेच महापालिकेसाठी महापालिका आयुक्त यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

पुणे येथील नामांकित गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थेच्या माध्यमातून यासाठी एक अॅप्लीकेशन तयार करण्यात आले असून त्याद्वारे विविध प्रश्नावलीच्या माध्यमातून ही माहिती संकलित करण्यात येणार आहे. यासाठी संपूर्ण महसूल यंत्रणेतील अधिकारी आणि कर्मचारी वर्ग यासाठी ७ दिवसांच्या विशेष मोहिमेद्वारे सहभागी होणार आहेत. तसेच सदर माहिती संकलनाची जबाबदारी स्वीकारून राज्यातील सर्वेक्षण प्राधान्याने व वेळेत पूर्ण करणार असल्याची माहिती विखे पाटील यांनी दिली.

याबैठकीस राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, सामान्य प्रशासन सचिव सुमंत भांगे यांच्यासह राज्यातील सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी दूरदृश्यप्रणाली द्वारे उपस्थित होते.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात