मुंबई – राज्यातील बळजबरीने किंवा आमिष दाखवून होणाऱ्या धर्मांतराच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने मंजूर केलेल्या धर्मस्वातंत्र्य विधेयकामुळे अशा कृत्यांवर कठोर कारवाई होईल, असे महसूलमंत्री Chandrashekhar Bawankule यांनी स्पष्ट केले.
या कायद्याचे समर्थन करणारे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख Uddhav Thackeray यांचे त्यांनी अभिनंदन केले.
बावनकुळे म्हणाले की, देशातील १२ राज्यांनी यापूर्वीच असा कायदा लागू केला असून महाराष्ट्रही आता त्यात सामील झाला आहे. मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी अत्यंत काळजीपूर्वक या कायद्याची मांडणी केली आहे.
यावेळी त्यांनी आमदार Jitendra Awhad यांच्यावर टीका करत, ते केवळ मतदारसंघातील विशिष्ट मतदारांना खूश करण्यासाठी राजकारण करत असल्याचा आरोप केला. महायुतीची समन्वय समिती बैठक पुढील आठवड्यात होणार असून मित्रपक्षांच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होईल, असेही त्यांनी सांगितले.
तक्रारींची प्रक्रिया पारदर्शक
आमदार Narendra Mehta यांच्याविरोधातील तक्रारीबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, मंत्री म्हणून तक्रार आल्यास तिची चौकशी करण्याचे आदेश देणे ही जबाबदारी आहे. तक्रार संबंधित कार्यालयाकडे पाठवली जाते आणि त्यात कोणताही वैयक्तिक हस्तक्षेप नसतो.
ओडिशा राजकारणावर भाष्य
ओडिशातील राज्यसभा निवडणुकीचा संदर्भ देत बावनकुळे म्हणाले की, पंतप्रधान Narendra Modi यांच्या विकासकामांमुळे काँग्रेस कमकुवत झाली असून तेथील आमदारांनीही भाजपला पाठिंबा दिला आहे. मोदींच्या विकासाची लाट देशभर पसरत असल्याचा दावा त्यांनी केला.

