ताज्या बातम्या महाराष्ट्र

औद्योगिक वसाहतीत श्री दत्त फाउंड्रीला शॉर्टसर्किटमुळे आग

कोल्हापूर : प्रतिनिधी  – शिरोली पुलाची येथील श्री दत्त फाउंड्रीला शॉर्टसर्किटने आग लागल्याची घटना सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. आगीत संपूर्ण कार्यालय जळून खाक झाले असून आर्थिक नुकसान झाले आहे. घटनास्थळी कामगारांनी आग विझवण्यासाठी गर्दी केली होती. अखेर दीड तासाच्या परिश्रमानंतर तीन अग्निशमन बंबाच्या साहाय्याने आग आटोक्‍यात आणली.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शिरोली औद्योगिक वसाहतीत श्री दत्त फाउंड्री रोहित बोडके यांच्या मालकीची आहे. आज सायंकाळी पाचच्या सुमारास मुख्य कार्यालयातून धुराचे लोट येताना दिसले. याची माहिती कारखान्याच्या मालकांना दिली.. तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केल्याने कार्यालय जळून खाक झाले. त्यानंतर तीन अग्निशामक दलाच्या गाड्या यांच्या साह्याने आग आटोक्यात आणली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

या आगीत संगणक, लॅपटॉप, मशीन्स व इतर साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. घटनास्थळी कामगारांनी अधिक गर्दी केली. सुमारे दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्‍यात आली. कारखान्याच्या अंतर्गत विद्युत जोडणीत शॉर्टसर्किटने आग लागल्याची शक्‍यता महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.

Supriya Gadiwan

Supriya Gadiwan

About Author

सुप्रिया गाडीवान (Supriya Gadiwan) यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून Masters in Journalism केले आहे. या आधी त्यांनी Speed ​​News live 24 आणि Behind the News in Kolhapur या news portal साठी काम केले आहे. राजकीय बातम्या लिहिणे, पोर्टल चे समाज माध्यम सांभाळणे, बातमी संपादन यात त्यांचा हातखंडा आहे. सध्या त्या राजकारण (therajkaran.com) या मुंबईतील मराठी न्यूज पोर्टल साठी राजकीय बातमीदारी करतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात