महाराष्ट्र ताज्या बातम्या

शासनाने ‘एकल-अविवाहित’ व्यक्तींसाठी प्रतिमाह मानधन सुरू करावे – एकल-अविवाहित विकास मंचाची मागणी

By Raju Zanke

जळगाव – हल्लीच्या धावत्या युगात अनेक स्त्री-पुरुष विविध कारणांमुळे कोणत्याही आधाराविना ‘एकल’ जीवन जगत आहेत. शिक्षण, आरोग्य, घर, रोजगार आणि सुरक्षिततेसारख्या मूलभूत गरजा भागविण्यात त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशा व्यक्तींच्या उदरनिर्वाहासाठी शासनाने कोणताही निकष न लावता प्रतिमाह मानधन सुरू करावे, अशी मागणी एकल-अविवाहित विकास मंचतर्फे प्रमोद पाटील यांनी केली आहे.

पाटील यांनी सांगितले की, या व्यक्तींसाठी ठिकठिकाणी सेवा प्रकल्प आणि आपुलकी सेवा केंद्रांची आवश्यकता आहे. कॉर्पोरेट कंपन्या, समाजसेवी संस्था, देणगीदार, अभ्यासक यांनीही पुढे येऊन सहकार्य करणे गरजेचे आहे. अशा व्यक्तींच्या जीवनमान उंचावण्यासाठी समाजाने एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

या संदर्भात सूचना अथवा सहकार्य करू इच्छिणाऱ्या व्यक्ती व संस्थांनी एकल-अविवाहित विकास मंचचे प्रमोद पाटील (मो. ९३२६३५९२२९) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात