महाराष्ट्र ताज्या बातम्या

Hutatma Smarak :महाडचे हुतात्मा स्मारक दारुड्यांचा अड्डा, पार्किंग झोन बनले; नगरपालिकेचे दृष्टीआड दुर्लक्ष

महाड – महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेले हुतात्मा स्मारक आज दारू पिणारे, बेवारस लोक आणि बेशिस्त पार्किंगचा अड्डा बनले आहे. सायंकाळच्या वेळी दारुड्यांनी स्मारकाच्या भिंतीला टेकून दारू प्यायची सवय लावली असून, सहा आसनी रिक्षा, मोटरसायकली आणि नगरपालिका कचरा हातगाड्यांनी परिसर वेढलेला असतो. नगरपालिकेच्या मुख्यालयालगत असलेल्या या स्मारकाची दयनीय अवस्था पाहून प्रशासनाच्या निष्क्रियतेचा आणि हुतात्म्यांच्या स्मृतीप्रती असलेल्या असंवेदनशीलतेचा स्पष्ट प्रत्यय येतो.

भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राण अर्पण केलेल्या नारायण उर्फ वसंत बाळकृष्ण दाते, कमलाकर विठ्ठल दांडेकर, अर्जुन कानू भोई उर्फ कडू, नथू दौलत टेकवले आणि विठ्ठल बिरवाडकर या महाडच्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ हे स्मारक उभारण्यात आले होते. परंतु आज हेच स्मारक प्रशासनाच्या उदासीनतेमुळे सन्मानाचे प्रतीक न राहता उपेक्षेचा बळी ठरले आहे.

स्मारक परिसरात पाण्याची साठवणूक, दुर्गंधी, अस्वच्छता, बेवारस व्यक्तींची झोपण्याची जागा आणि दारू प्यायचा अड्डा असे चित्र रोज पाहायला मिळते. महाड नगरपालिका प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे स्मारकाच्या सन्मानाचा घात होत असून, स्वातंत्र्यलढ्यात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचा अपमान केला जात आहे.

या संपूर्ण प्रकरणाबाबत नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. नागरिक आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांकडून यावर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.

Avatar

Milind Mane

About Author

मिलिंद माने (Milind Mane) हे महाड येथील ज्येष्ठ पत्रकार असून कोकण विभागातील राजकीय विश्लेषणात त्यांचा हातखंड आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात