महाराष्ट्र

जितेंद्र आव्हाड यांचे वक्तव्य हा वारकरी, माळकर्‍यांचा अपमान : देवेंद्र फडणवीस

X: @therajkaran

पुणे: आमचे वारकरी, धारकरी, माळकरी, टाळकरी हे सगळे बहुजन समाजातील आहेत आणि ते मांसाहार करीत नाहीत. मग जितेंद्र आव्हाड यांचे वक्तव्य हा वारकरी आणि माळकर्‍यांचा अपमान नाही का, असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विचारला.

जितेंद्र आव्हाडांच्या प्रभूश्रीरामांवरील वादग्रस्त विधानावर पुणे येथे माध्यमांनी प्रतिक्रिया विचारली असता, ते बोलत होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांचे वक्तव्य हे मुर्खपणाचे आणि निव्वळ प्रसिद्धी मिळविण्यासाठी आहे. तसे करणे हा त्यांचा स्वभाव आहे. प्रभूश्रीराम हे बहुजनांचे आहेत, अभिजनांचे, दलितांचे, आदिवासींचे, सर्वांचेच आहेत. या देशात असे कुणीही नाही, जे प्रभूश्रीरामांना मानत नाहीत. त्यात शाकाहारी आणि मांसाहारी असा वाद करणे सर्वथा अनुचित आहे.

आमचे वारकरी, माळकरी, टाळकरी, धारकरी हे सगळे बहुजन समाजातील आहेत. तेही सगळेच प्रभूश्रीरामांना मानतात. मग आव्हाडांचे वक्तव्य हा त्यांचा अपमान नाही का? विनाकारण विवाद उभा करणे आणि अशांतता तयार होईल असे वागणे, हे कुणाच्याच हिताचे नाही. जे स्वत:ला हिंदूत्त्ववादी असल्याचा कांगावा करतात, तेही पूर्णपणे मौन पाळून आहेत. त्यांनी साधा निषेधही करु नये, यावरुन ते किती बेगडी आहेत, हे सर्वांच्या लक्षात आले आहे, असेही ते म्हणाले.

बारामती अ‍ॅग्रोवरील कारवाईबाबत माध्यमांत आलेल्या बातम्या आणि त्यावरील प्रतिक्रियांसंदर्भात विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हे विनाकारण स्वत:ला शहीद घोषित करण्याचे प्रकार आहेत. धाड पडली की नाही, हे मला माहिती नाही. त्यांनी काही केले नसेल तर घाबरण्याची गरज नाही. उगाच याला राजकारणाशी जोडण्याची गरज नाही.

Also Read: मुंबई विद्यापीठात नवीन शैक्षणिक धोरणाबाबत केंद्राकडे पाठपुरावा करणार…..!

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात