महायुती सरकारमधील महामंडळ नियुक्त्या, सत्तासंतुलन आणि संभाव्य नव्या राजकीय समीकरणांचे प्रतीकात्मक संपादकीय चित्र. महाराष्ट्र ताज्या बातम्या

महामंडळ वाटपात ‘पवार फॅक्टर’चा प्रभाव…?

४८-२९-२२ फॉर्म्युला बदलणार? शरद पवार गटाच्या संभाव्य सत्ताप्रवेशाच्या चर्चेमुळे महायुतीचे नवे राजकीय गणित नियुक्त्या पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता मुंबई: महायुती सरकारमधील दीड वर्षांहून अधिक काळ रखडलेल्या महामंडळांच्या राजकीय नियुक्त्या लवकरच जाहीर होतील, अशी चर्चा सुरू असतानाच राज्याच्या राजकारणातील नव्या घडामोडींमुळे ही प्रक्रिया पुन्हा विलंबित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेनुसार, राष्ट्रवादी […]

Investigative journalist holding RTI applications before locked government filing cabinets symbolising transparency challenges in Maharashtra’s Energy Department and public administration. महाराष्ट्र ताज्या बातम्या विश्लेषण

मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतील ऊर्जा विभागाला RTI चे वावडे 

महाराष्ट्र ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न पाहत असताना पारदर्शक प्रशासनही तितकेच महत्त्वाचे आहे. महावितरण आणि ऊर्जा विभागाकडे माहितीच्या अधिकारातून माहिती मिळवताना आलेल्या अनुभवांवर आधारित विवेक भावसार यांचे हे संपादकीय प्रशासनातील उत्तरदायित्व आणि RTI व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित करते. महाराष्ट्र ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी चे स्वप्न बघतो आहे. ते स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्याची क्षमता महाराष्ट्रात आहे. त्यासाठी देवेंद्र फडणवीस […]

Chief Minister Devendra Fadnavis addresses industry leaders during the launch of the India–UK Comprehensive Economic and Trade Agreement implementation in Mumbai. महाराष्ट्र ताज्या बातम्या

भारत–यूके व्यापार कराराने महाराष्ट्रासाठी जागतिक बाजारपेठेची नवी दारे खुली; निर्यात, गुंतवणूक आणि उद्योगांना मोठी संधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत कराराच्या अंमलबजावणीचा शुभारंभ; एमएसएमई, कृषी, वाहन, औषधनिर्माण आणि आयटी क्षेत्राला होणार फायदा मुंबई: भारत आणि युनायटेड किंगडम (यूके) यांच्यातील सर्वसमावेशक आर्थिक व व्यापार करार (CETA) अंमलात आल्यानंतर महाराष्ट्राच्या निर्यात, गुंतवणूक आणि औद्योगिक विकासाला नवी गती मिळणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबई येथे या कराराच्या अंमलबजावणीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात त्यांनी प्रतिनिधिक […]

Chief Minister Devendra Fadnavis announcing the agricultural electricity bill waiver package at a farmers' gathering in Maharashtra. महाराष्ट्र ताज्या बातम्या

४८ हजार कोटींच्या कृषी वीज थकबाकी माफीची मुख्यमंत्र्यांची घोषणा; लाखो शेतकऱ्यांना दिलास्याची शक्यता

अंमलबजावणीचा आराखडा, पात्रतेचे निकष आणि निधी व्यवस्थेकडे राज्याचे लक्ष मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी राज्यातील कृषी वीजग्राहकांसाठी सुमारे ४८ हजार कोटी रुपयांच्या कृषी वीज थकबाकी माफीची घोषणा केली. शासन निर्णय (GR) आणि अंमलबजावणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या निर्णयाचा लाभ राज्यातील अंदाजे ४० ते ४५ लाख कृषी वीजग्राहकांना मिळू शकतो, असा अंदाज ऊर्जा क्षेत्रातील उपलब्ध आकडेवारीच्या आधारे व्यक्त केला […]

'वर्षा' निवासस्थानी झालेल्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण; त्यानंतर जयंत पाटील यांनी भेटीमागील कारण स्पष्ट करत महायुती प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम दिला. (प्रतिकात्मक चित्र) महाराष्ट्र ताज्या बातम्या

‘वर्षा’वरील भेटीमागचे गूढ अखेर उलगडले; महायुती प्रवेशाच्या चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम

ईश्वरपूर नगराध्यक्षांच्या अपात्रतेच्या प्रकरणासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट; पक्ष सोडण्याचा प्रश्नच नाही, स्पष्ट भूमिका मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी झालेल्या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात सुरू झालेल्या विविध तर्क-वितर्कांना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी बुधवारी स्पष्ट उत्तर दिले. ही भेट महायुतीत प्रवेश, मंत्रिपद किंवा पक्ष विलीनीकरणासाठी नसून, सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर नगराध्यक्षांच्या अपात्रतेच्या […]

महाराष्ट्रातील आधुनिक शहर विकासाचे प्रतीकात्मक चित्र, मेट्रो रेल्वे, उंच इमारती, स्मार्ट रस्ते, पाणीपुरवठा व्यवस्था आणि अर्बन चॅलेंज फंड दर्शवणारे दृश्य. महाराष्ट्र ताज्या बातम्या

९० हजार कोटींचा ‘अर्बन चॅलेंज’!

महाराष्ट्रातील शहरांच्या कायापालटासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मेगा ब्लूप्रिंट पहिल्या टप्प्यात ४४,८०० कोटींच्या प्रकल्पांना गती; केंद्र, राज्य आणि बाजारातून निधी उभारणीचा आराखडा मुंबई– महाराष्ट्रातील शहरांच्या विकासासाठी तब्बल ९० हजार कोटी रुपयांच्या ‘अर्बन चॅलेंज फंड’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने सोमवारी गती दिली. पहिल्या टप्प्यात ४४,८०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांची अंमलबजावणी करण्याचा आराखडा निश्चित करण्यात आला असून, त्यासाठी केंद्र […]

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाबाबत भूमिका मांडताना. महाराष्ट्र ताज्या बातम्या

२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहावेत; बावनकुळेंची भूमिका, नेतृत्वबदलाच्या चर्चांना उत्तर

‘मुख्यमंत्री होण्याची कुणीही घाई करू नये’; महसूलमंत्र्यांची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत मुख्यमंत्रीपदाबाबत सुरू असलेल्या राजकीय चर्चांच्या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला ठाम पाठिंबा दर्शवित नेतृत्वबदलाच्या चर्चांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये बावनकुळे यांनी, “देवेंद्र फडणवीसच २०३४ पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहावेत, ही १४ कोटी जनतेची भावना आहे. मुख्यमंत्री होण्याची कुणीही घाई करू […]

विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत सहभागी होत मुंबईच्या विकासाविषयी भाष्य करताना भाजप आमदार संजय उपाध्याय. महाराष्ट्र ताज्या बातम्या

‘मुंबई बदलते आहे’; विधानसभेत संजय उपाध्याय यांनी मांडला विकासाचा अजेंडा

मुंबई: विधानसभेतील अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत सहभागी होत भाजपचे बोरीवलीचे आमदार संजय उपाध्याय यांनी मुंबईतील पायाभूत सुविधा, गृहनिर्माण, पाणीपुरवठा, वाहतूक, पर्यावरण, शिक्षण आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित विविध मुद्दे सभागृहात मांडले. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या विकासकामांचे कौतुक करत विरोधकांवरही टीका केली. संपूर्ण अधिवेशनात विरोधकांकडे जनतेसमोर मांडण्यासारखा कोणताही ठोस मुद्दा नव्हता. विकासाच्या विषयावर बोलण्याचे धैर्य त्यांनी […]

MNS chief Raj Thackeray and Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis in a split editorial image with the Vidhan Bhavan and a blurred Facebook post in the background, symbolising Raj Thackeray’s criticism of the Chief Minister through a social media post. महाराष्ट्र ताज्या बातम्या

राज ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर थेट निशाणा; ‘सत्तेचा माज’, ‘तुमच्या मौनाचं कारण काय?’ असा सवाल

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष Raj Thackeray यांनी मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांना उद्देशून फेसबुकवर केलेल्या सविस्तर पोस्टमधून राज्यातील सत्ताधारी नेतृत्वावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. भाजपच्या काही आमदार, मंत्री आणि पदाधिकाऱ्यांच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मौनावरही थेट प्रश्न उपस्थित केला आहे. राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, केंद्रातील भाजप […]

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पवना जलवाहिनी प्रकल्पासंदर्भातील उच्चस्तरीय बैठकीत वरिष्ठ मंत्री आणि लोकप्रतिनिधींशी चर्चा करताना. महाराष्ट्र ताज्या बातम्या

शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करूनच पवना जलवाहिनी प्रकल्प राबविणार; २०५० पर्यंतच्या जलआराखड्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

पुणे-पिंपरी चिंचवडच्या भविष्यातील पाणीगरजा लक्षात घेऊन दीर्घकालीन नियोजनावर भर मुंबई : पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगर प्रदेशातील वाढत्या पाणीगरजा लक्षात घेऊन राज्य सरकारने पवना थेट समांतर जलवाहिनी प्रकल्पाबाबत महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली आहे. शेतकऱ्यांची संमती, विश्वास आणि संवादाशिवाय हा प्रकल्प पुढे नेला जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली. याचबरोबर, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांच्या २०५० पर्यंतच्या पाणीपुरवठ्याचा सर्वसमावेशक […]