महाराष्ट्र ताज्या बातम्या

Mahad : जमिनीच्या वादातून जोडप्यास मारहाण, शिवीगाळ

८ जणांविरोधात ॲट्रॉसिटी, विनयभंग व जीवघेणा हल्ल्याचा गुन्हा दाखल

महाड – हॉटेलच्या जागेसंदर्भातील जुन्या वादातून एकाच कुटुंबातील आठ जणांनी एका जोडप्यावर हल्ला करून त्यांना मारहाण केली, जातिवाचक शिवीगाळ केली आणि अश्लील वर्तन केल्याची गंभीर घटना महाड शहरात घडली आहे. या प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात आठ आरोपींविरोधात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत तसेच विनयभंग आणि जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न अशा गंभीर आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना १९ जून २०२५ रोजी दुपारी २:१५ च्या सुमारास एम.जी. रोडवरील हॉटेल ‘मेजवानी किचन’ येथे घडली. प्रथमेश विजय जाधव (रा. डोंगरीपूल, एम.जी. रोड, महाड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी यांच्यात हॉटेलच्या किचनच्या जागेबाबत गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू होता. याच वादातून गुरुवारी आरोपींनी प्रथमेश जाधव व त्यांच्या पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच जातीवाचक शिवीगाळ करत अश्लील वर्तन केलं.

या प्रकरणी प्रसाद रामकृष्ण जाधव, पूजा प्रसाद जाधव, दर्शन प्रसाद जाधव, यश प्रसाद जाधव, रोशनी यश जाधव, निर्मला सावंत, साहिल सावंत आणि प्रवीण सावंत (सर्व रा. काकरतळे, महाड – रायगड) यांच्याविरोधात भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांखाली तसेच ॲट्रॉसिटी आणि विनयभंग कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास महाडचे डीवायएसपी शंकर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाड शहर पोलीस करत आहेत.

Avatar

Milind Mane

About Author

मिलिंद माने (Milind Mane) हे महाड येथील ज्येष्ठ पत्रकार असून कोकण विभागातील राजकीय विश्लेषणात त्यांचा हातखंड आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात