महाराष्ट्र ताज्या बातम्या

Mahad: महाड तालुक्यातील ग्रामपंचायतींकडे पाणीपुरवठा व पथदिव्यांचे तब्बल ₹१३ कोटींचे थकित बिल; वीज मंडळाकडून नोटीस, तरीही भरणा नाही!

महाड: महाड तालुक्यातील १३४ ग्रामपंचायतींकडून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडे (महावितरण) पथदिवे व सार्वजनिक पाणीपुरवठ्यासाठी वापरलेल्या विजेची तब्बल ₹१३ कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे.

पथदिवे व पाणीपुरवठा थकबाकी
• पथदिव्यांसाठी : ₹९ कोटी ४१ लाख ७६ हजार
• सार्वजनिक पाणीपुरवठ्यासाठी : ₹३ कोटी ६३ लाख ६१ हजार
एकूण थकबाकी : ₹१३ कोटी ५ लाखांपेक्षा जास्त

सूत्रांच्या माहितीनुसार ही थकबाकी मागील पाच ते सात वर्षांपासून वाढत असून दर महिन्याला अव्वाच्या सव्वा वाढत आहे.

विभागनिहाय थकबाकी (पथदिवे)
• बिरवाडी विभाग (३९ ग्राहक) – ₹१.३४ कोटी
• कुंबळे-गोरेगाव (२७ ग्राहक) – ₹६५.७८ लाख
• महाड ग्रामीण (४९ ग्राहक) – ₹१.६६ कोटी
• महाड शहर (२५ ग्राहक) – ₹१.३० कोटी
• एमआयडीसी गोरेगाव (२३ ग्राहक) – ₹८४.६१ लाख
• नाते विभाग (४७ ग्राहक) – ₹१.६६ कोटी
• वहूर (३० ग्राहक) – ₹१.३९ कोटी
• विन्हेरे (६१ ग्राहक) – ₹२.७५ कोटी

विभागनिहाय थकबाकी (पाणीपुरवठा)
• बिरवाडी विभाग (२३ ग्राहक) – ₹१.२५ कोटी
• कुंबळे-गोरेगाव (२३ ग्राहक) – ₹७२.६२ लाख
• महाड ग्रामीण (४४ ग्राहक) – ₹९२.९९ लाख
• महाड शहर (५ ग्राहक) – ₹१२.१० लाख
• एमआयडीसी गोरेगाव (१२ ग्राहक) – ₹६.२३ लाख
• नाते विभाग (३६ ग्राहक) – ₹४०.७१ लाख
• वहूर (३३ ग्राहक) – ₹३.०८ लाख
• विन्हेरे (६० ग्राहक) – ₹९.९२ लाख

राजकीय वरदहस्तामुळे वसुलीत अडथळे?

महावितरणकडून वारंवार नोटीस देऊनही ग्रामपंचायतींकडून थकीत रक्कम भरली जात नसल्याचा आरोप आहे. स्थानिक ग्रामस्थांकडून पाणीपट्टी व्यवस्थित वसूल न झाल्यामुळे ग्रामपंचायतींवर थकबाकीचा डोंगर वाढत आहे. यामागे स्थानिक राजकीय वरदहस्तामुळे कारवाईला अडथळा येत असल्याचे बोलले जात आहे.

जिल्हा परिषद प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष?

ग्रामपंचायत हद्दीतील पथदिव्यांचे बिल जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दिले जात असल्याचे अधिकाऱ्यांनी मान्य केले आहे. मात्र पाणीपट्टी वसुलीचा प्रश्न ग्रामपंचायतींकडे असून त्यावरील टाळाटाळीमुळेच आज कोट्यवधींची थकबाकी निर्माण झाली आहे.

निवडणुकीत ठरणार प्रमुख मुद्दा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये विकासात्मक कामांबरोबरच ग्रामपंचायतींच्या तुंबलेल्या वीज बिलांची थकबाकी हा ऐरणीवरील मुद्दा ठरणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

दरम्यान, सामान्य ग्राहकांकडून थकबाकीवर तातडीने वीजपुरवठा तोडणाऱ्या महावितरणकडून ग्रामपंचायतींवर मात्र कोणती कारवाई झाली नाही, याबाबत ग्रामस्थ संतप्त आहेत.

Avatar

Milind Mane

About Author

मिलिंद माने (Milind Mane) हे महाड येथील ज्येष्ठ पत्रकार असून कोकण विभागातील राजकीय विश्लेषणात त्यांचा हातखंड आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात