ताज्या बातम्या महाराष्ट्र

महाड शहर पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी संदीप भोसले

रमेश तडवी यांची ठाणे ग्रामीणमध्ये बदली

महाड: महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांनी आपल्या बदलीबाबत नाराजी व्यक्त करत वरिष्ठांकडून कथित जातीवाचक छळ होत असल्याचा आरोप करीत पोलीस महासंचालकांना पत्राद्वारे आत्महत्येचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर त्यांची ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी संदीप अशोक भोसले यांनी महाड शहर पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारला आहे.

नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक संदीप भोसले हे मूळ सातारा जिल्ह्यातील असून त्यांनी तेथेच संपूर्ण शिक्षण पूर्ण केले आहे. कोणतीही पोलीस पार्श्वभूमी नसतानाही स्वतःच्या कर्तृत्वावर त्यांनी पोलीस दलात आपला ठसा उमटवला आहे. भोसले यांना सुमारे २० वर्षांचा पोलीस सेवेचा अनुभव असून, गडचिरोली या नक्षलप्रभावित भागात त्यांनी दीड वर्ष सेवा बजावली आहे. त्यानंतर पुणे ग्रामीण, नाशिक, नंदुरबार, नागपूर, सिंधुदुर्ग तसेच रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.

२०१७ पासून ते पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असून, सलग दहा वर्षांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल २६ जानेवारी २०२५ रोजी त्यांना पोलीस संचालक पदकाने सन्मानित करण्यात आले होते.

महाड शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही देताना भोसले यांनी आगामी शिवजयंती, होळी, चवदारतळे सत्याग्रह दिन तसेच इतर सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी धार्मिक व जातीय सलोखा राखून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

Milind Mane

About Author

मिलिंद माने (Milind Mane) हे महाड येथील ज्येष्ठ पत्रकार असून कोकण विभागातील राजकीय विश्लेषणात त्यांचा हातखंड आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात