महाराष्ट्र ताज्या बातम्या

Assembly Session: मुंबई मनपा शाळांच्या ‘खासगीकरणा’वर विधानसभा तापली; मंत्र्यांच्या उत्तरांवर नाराजी, अध्यक्षांचे स्पष्ट निर्देश

नागपूर –  मुंबई महानगरपालिका शाळांच्या कथित खासगीकरणासंदर्भातील मुद्दा आज विधानसभेतील प्रश्नोत्तर तासात चांगलाच गाजला. राज्यमंत्री, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या उत्तरांनी सदस्यांचे समाधान न झाल्याने वातावरण तंग झाले. अखेर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी “उत्तर चुकीचे वाटत असेल तर सदस्यांनी पुढील भूमिका घ्यावी” असे स्पष्ट निर्देश दिले.

मालाड (मुंबई उपनगर)चे आमदार अस्लम शेख यांनी उपप्रश्नातून गंभीर आरोप उपस्थित केला, “खासगीकरण धोरणाच्या आधारे चालणाऱ्या शाळांत शिक्षकांची पात्रता पूर्ण नाही. प्रशिक्षित नसलेल्या शिक्षकांकडून वरच्या वर्गांना अध्यापन चालले आहे, हे नियमबाह्य आहे.”

मूळ प्रश्नाला “खासगीकरण नाही” असे उत्तर देणाऱ्या राज्यमंत्री मिसाळ यांनी पुढे हा विषय “माझ्या खात्याशी संबंधित नाही” असे सांगितले. यामुळे सदस्यांची नाराजी आणखीनच वाढली.

शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी मनपाने स्वतः धोरण आणल्याची कबुली दिली. ते म्हणाले, “शिक्षण विषयक सर्वोच्च न्यायालयाचे निकाल पाहून पुढील पावले ठरवू.”

पालकमंत्री लोढा यांनी मालवणी परिसरातील पालकांच्या आंदोलनाच्या वेळी स्वतः हस्तक्षेप केल्याची माहिती सभागृहाला दिली.

काँग्रेसचे अमिन पाटील म्हणाले, “कोणत्याही संस्थेने पालकत्व घेण्यास विरोध नाही, पण टेंडर प्रक्रिया पारदर्शक होती का? चौकशी केली पाहिजे.” तरीही राज्यमंत्री मिसाळ आपल्या उत्तरावर कायम राहिल्या की “या शाळांचे खासगीकरण झालेले नाही.”

उत्तरांमधील विसंगतीमुळे गोंधळ निर्माण झाल्याची सदस्यांनी नोंद घेतली. शेवटी अध्यक्ष नार्वेकर यांनी सदस्यांना “जर उत्तर समाधानकारक नसेल, तर योग्य ती भूमिका घ्या” असे निर्देश देत चर्चा संपवली.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात