महाराष्ट्र ताज्या बातम्या

योगेश त्रिवेदी यांच्या परखड पत्रकारितेचा सुगंध समाजात दरवळत राहो – भाजपा नेते श्याम कदम यांची भावस्पर्शी भावना

By योगेश त्रिवेदी

मुंबई : शिवसेना शाखा क्रमांक १४च्या ‘संस्कृती’तर्फे ‘सामना’चे निवृत्त ज्येष्ठ पत्रकार योगेश वसंत त्रिवेदी उर्फ गुरुजी यांचा नुकताच मोगऱ्याच्या फुलांच्या रोपाने सन्मान करून गौरव करण्यात आला. या प्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते श्यामराव कदम यांनी भावना व्यक्त करताना म्हटले की, “गुरुजींच्या परखड पत्रकारितेचा सुगंध मोगऱ्याप्रमाणे समाजात दरवळत राहावा, ते शतायुषी होवोत आणि आम्हा सर्वांना कायम मार्गदर्शन मिळत राहो.”

अंबरनाथ येथून प्रकाशित होणाऱ्या ‘दैनिक अंबरनाथ टाइम्स’ तर्फे जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याच्या निमित्ताने, शिवसेना शाखा क्रमांक १४, गावदेवी मंडळ, वाहतूक सेना, ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने त्रिवेदी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र पुरस्काराने सन्मानित अशोक महादेव उर्फ दादासाहेब शिंदे यांच्या हस्ते त्रिवेदी यांना शाल, ‘भरत वाक्य’ ग्रंथ (लेखक: स्वराधीश भरत बलवल्ली) आणि मोगऱ्याचे फुलांचे रोप देण्यात आले.

या वेळी उपस्थित असलेल्यांमध्ये –
दादासाहेब शिंदे, श्याम साळवी, वसंत तांबे, भाविका नवलू, जयवंत मोरे, दिलीप देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रणवरे यांचा समावेश होता. सर्व मान्यवरांनी त्रिवेदी यांच्या पत्रकारितेचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

सत्काराला उत्तर देताना योगेश त्रिवेदी यांनी आपल्या पत्रकारितेतील अनेक गूढ आणि रसाळ राजकीय आठवणी उलगडल्या.

कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन शिवसेनेचे उपशाखाप्रमुख राजेश बागकर यांनी केले, तर संपर्क प्रमुख दशरथ मांजरेकर यांनी विशेष संयोजन पाहिले. विवेक सावंत, दिपक पाटील, लक्ष्मण मोरे, रविंद्र पवार, शतृघ्न फरांदे, रमेश रासम, दिलीप देसाई यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात