महाराष्ट्र ताज्या बातम्या

Monsoon Session: विधानभवन हाणामारी प्रकरणात गोपीचंद पडळकर यांची पत्रकार परिषदेत दिलगिरी; “आम्ही कायद्याला मानणारे कार्यकर्ते आहोत”

मुंबई : विधानभवनाच्या तळमजल्यावर गुरुवारी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांशी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांत झालेल्या हाणामारी प्रकरणावर आज पडळकर यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांनी केलेल्या चुकीसाठी दिलगिरी व्यक्त केली आणि “आम्ही कायद्याला मानणारे कार्यकर्ते आहोत, त्यामुळे जी कारवाई होईल, त्याला न्यायालयात सामोरे जाऊ,” असे सांगितले.

पडळकर म्हणाले, “कालच्या घटनेबाबत मी विधानसभेच्या अध्यक्षांकडे दिलगिरी व्यक्त केली आहे. आमच्या कार्यकर्त्यांकडून चूक झाली, त्यांना सक्त ताकीद दिली आहे. जी काय कारवाई होईल, ती स्वीकारू.”

जितेंद्र आव्हाड यांनी मध्यरात्री ठिय्या आंदोलन केल्याचा उल्लेख करत पडळकर यांनी प्रश्न केला, “पोलिसांच्या गाडीसमोर आडवे पडून कारवाई अडवणे ही गुंडगिरी नाही का?”

पडळकर पुढे म्हणाले, “हा विषय विधानसभा अध्यक्षांच्या अखत्यारीत येतो. अध्यक्ष आणि सभापती हेच सर्वोच्च आहेत. त्यांच्या भूमिकेवर मी काही बोलणार नाही.”

गुरुवारी सायंकाळी विधानभवनाच्या तळमजल्यावर दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांत झालेल्या जोरदार हाणामारीनंतर पोलीसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी रात्री उशिरा तक्रार दाखल झाली.

आपली भूमिका स्पष्ट करत पडळकर म्हणाले, “आपण तेव्हाचे व्हिडिओ पाहू शकता. मी पायऱ्यांवर कोपऱ्यात कार्यकर्त्यांसोबत होतो. शरद पवार गटाचे नितीन देशमुख जवळ आले, त्यांची माझ्याशी ओळखही नाही. मी फक्त कार्यकर्त्यांसोबत छायाचित्र काढत होतो.”

ते पुढे म्हणाले, “काल लक्षवेधी सूचना होती, त्यामुळे दिवसभर सभागृहात होतो. मंत्री उपस्थित नसल्यामुळे लक्षवेधी सूचना रखडली आणि त्यामुळे सभागृहाबाहेर आलो.”

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात