महाराष्ट्र ताज्या बातम्या

Monsoon Session : राड्यानंतर विधानभवनात अभूतपूर्व बंदोबस्त; सर्व पास रद्द, विशेष परवानगीशिवाय प्रवेश बंद

मुंबई : विधानभवन परिसरात काल घडलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर आज पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानभवनात अभूतपूर्व सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विधानभवन सुरक्षा कार्यालयाने सर्व प्रकारचे प्रवेश पास तातडीने रद्द केल्याचे आदेश जारी केले गेले.

या निर्णयानुसार कोणत्याही शासकीय अधिकारी वा कर्मचाऱ्यांना देखील प्रवेश दिला गेला नाही. फक्त विशेष परवानगी पत्र असणाऱ्यांनाच प्रवेश दिला जात होता. कोणतेही सरकारी ओळखपत्र, स्टाफ पास किंवा वाहन पास वैध मानले गेले नाहीत.

काल नेमकं काय घडलं?

विधानभवनाच्या तळमजल्यावर गुरुवारी दोन आमदारांच्या कार्यकर्त्यांत झालेल्या जोरदार हाणामारीमुळे परिसरात तणाव निर्माण झाला. यामुळेच सुरक्षा यंत्रणांनी आज विशेष दक्षता घेतली.

सुरक्षा यंत्रणांचा कडक निर्णय

विधानभवन परिसरातील वाढती गर्दी, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या गोंधळामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्यांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस असल्याने महत्त्वपूर्ण विधेयकांवर चर्चा होती. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाने चोख सुरक्षा उपाययोजना केल्या, अशी माहिती विधानभवन सुरक्षा कार्यालयाने दिली.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात