ताज्या बातम्या महाराष्ट्र

नवाब मलिक अजित पवार गटाच्या कार्यालयात, दादा गटाचे प्रतोद अनिल पाटलांसोबत चर्चा

नागपूर

आजपासून नागपूरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. या वादळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नवाब मलिकांच्या नावावरुन चर्चा सुरू झाली आहे. नवाब मलिक हे अजित पवार गटाच्या कार्यालयात गेल्यानं चर्चेला उधाण आलं आहे. अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटलांसोबत त्यांच्या कार्यालयात नवाब मलिकांनी चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नवाब मलिक अजित पवारांच्या गटात जाणार अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

यंदाचं हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात बॅनरबाजी करीत कालच हिवाळी अधिवेशनाची सुरुवात केली. आजही विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन सुरू केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाने नेहमीच ४२ आमदारांचं समर्थन असल्याचा दावा केला आहे. मात्र यापैकी केवळ ४१ आमदारांची नावं समोर आली होती. नवाब मलिक तटस्थ असल्याचे म्हटले जात होते. मात्र आज हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नवाब मलिक यांनी अजित पवार गटाच्या कार्यालयात उपस्थिती दर्शवल्यामुळे अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. कोणत्या गटात जाणार याबाबत नवाब मलिकांनी अद्याप कोणतेही भाष्य केलेले नाही.

नवाब मलिक महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असताना नेहमी भाजपविरोधातील हल्ल्याचं नेतृत्व केलं होते. मात्र यानंतर मलिकांना दाऊद इब्राहिम याच्या बहिणीशी कथित व्यवहार केल्याप्रकरणी त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले होते. राष्ट्रवादी पक्षाच्या फुटीच्या काळात ते तुरुंगात होते. अजित पवारांनी त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न केल्याची चर्चा होती, त्यामुळे ते अजित पवार गटात जातील असा अंदाज वर्तवला जात होता.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात