महाराष्ट्र ताज्या बातम्या

N D Studio : एन.डी. स्टुडिओमध्ये २५ डिसेंबरपासून कार्निवल; कलाकारांची विशेष उपस्थिती

मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने २५ ते ३१ डिसेंबर या कालावधीत कर्जत–खालापूर येथील एन.डी. स्टुडिओमध्ये भव्य कार्निवलचे आयोजन करण्यात आले आहे. हे कार्निवल दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत खुले राहणार असून, खेळ, मनोरंजन आणि लोकप्रिय कलाकारांसोबत संवाद अशा विविध कार्यक्रमांची मेजवानी पर्यटकांना अनुभवता येणार आहे.

या कार्निवलमुळे वर्षाअखेरीस कौटुंबिक पर्यटनाचा आनंद लुटण्याची अनोखी संधी मिळणार असून, लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांसाठी खास उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सर्व वयोगटांसाठी खास उपक्रम

सांताक्लॉज मॅस्कॉट, कार्टून मॅस्कॉट, टॅटू मॅस्कॉट, रोमिंग जगलर, रोमिंग वॉकर, मिकी माऊस बलून, ट्रॅम्पोलीन, ३६० अंश सेल्फी बूथ, स्टोरी पपेट शो (२५ ते ३० मिनिटे) आणि मॅजिक शो. 

कलाकारांची मांदियाळी – ‘सेलिब्रिटी गप्पा’

  • कविता लाड : २५ डिसेंबर | दु. ४ ते ६
  • सुव्रत जोशी व सखी गोखले : २६ डिसेंबर | दु. ४ ते ६
  • अदिती सारंगधर : २७ डिसेंबर | दु. ४ ते ६
  • विराजस कुलकर्णी, उर्मिला कोठारे, विक्रम गायकवाड : २८ डिसेंबर | दुपारी १२
  • आनंद इंगळे : २९ डिसेंबर | दु. ४ ते ६
  • डॉ. गिरीश ओक : ३० डिसेंबर | दु. ४ ते ६
  • संजय मोने : ३१ डिसेंबर | दु. ४ ते ६

या सर्व कलाकारांसोबत गप्पांचा विशेष कार्यक्रम रंगणार आहे.

तिकीट बुकिंग ऑनलाइन www.ndartworld.com या संकेतस्थळावर तसेच स्टुडिओच्या ठिकाणी ऑफलाइन उपलब्ध आहे. अधिकाधिक पर्यटकांनी या कार्निवलला भेट द्यावी, असे आवाहन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी केले आहे.

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात