महाराष्ट्र ताज्या बातम्या

Nitesh Rane: राज्यात २५ ऑगस्टला ‘वराह जयंती’ शासकीय पातळीवर साजरी करण्याची मागणी

मंत्री नितेश राणे यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांना खुले पत्र

मुंबई – आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपने हिंदू मतदारसंघ मजबूत करण्यासाठी नियोजनबद्ध हालचाली सुरू केल्याचे दिसत आहे. याचाच भाग म्हणून, आज भाजप सरकारमधील मंत्री नितेश राणे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून २५ ऑगस्टला ‘वराह जयंती’ राज्यस्तरावर शासकीय पातळीवर साजरी करण्याची मागणी केली आहे.

राणे यांनी आपल्या पत्रात स्पष्ट केले आहे की, हिंदू धर्मातील दहा अवतारांपैकी तिसरा अवतार म्हणजे वराह देव, ज्यांनी पाताळातून पृथ्वीचा उद्धार केला. परंपरेत हा अवतार पूजनीय मानला जातो. त्यामुळे राज्य सरकारने २५ ऑगस्टला ‘वराह जयंती उत्सव दिवस’ म्हणून जाहीर करावा, असा त्यांचा आग्रह आहे.

राणे यांनी मांडलेल्या प्रस्तावात असे नमूद आहे की, जर सरकारने मान्यता दिली तर हा पहिलाच प्रसंग असेल, जेव्हा ‘वराह जयंती’ शासकीय स्तरावर साजरी केली जाईल. फक्त मंदिरांपुरता उत्सव मर्यादित न राहता, जिल्हा पातळीपासून प्रमुख शहरांपर्यंत भव्य धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम, प्रभातफेऱ्या, पूजा-अर्चा, शैक्षणिक स्पर्धा व भक्तांच्या सहभागाचे मोठे आयोजन करण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

राज्यात आधीच राजकीय वातावरण तापलेले असताना, या निर्णयाने नवे वादळं उठण्याची शक्यता आहे. विरोधकांचा पारा आणखी चढणार का, आणि सत्ताधाऱ्यांचा हिंदुत्वाचा अजेंडा अधिक धारदार होणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

२५ ऑगस्टला महाराष्ट्र एका नव्या ‘राज्यस्तरीय धार्मिक उत्सवा’चा साक्षीदार ठरणार, हे निश्चित झाले आहे. मात्र, या उत्सवामागील राजकीय तापमान किती वाढेल, हे पाहणे आता सर्वांच्या कुतूहलाचा विषय ठरले आहे.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

2 Comments

  1. trading platform

    August 20, 2025

    There’s certainly a lot to know about this issue. I
    like all the points you have made.

  2. FxPro ECN account

    August 20, 2025

    Hey There. I found your blog using msn. This is an extremely
    well written article. I will make sure to
    bookmark it and return to read more of your useful info.

    Thanks for the post. I will definitely return.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात