महाराष्ट्र ताज्या बातम्या

सोलरमधील स्फोटात घातपात नाही : देवेंद्र फडणवीस

X: @therajkaran

नागपूर: ‘सोलर इंडस्ट्रिज इंडिया लिमिटेड’मध्ये झालेल्या स्फोटामध्ये कोणताही घातपात प्राथमिक चौकशीमध्ये दिसत नाही. स्फोटाच्या शेवटच्या क्षणापर्यंतचे ‘सीसीटिव्ही फुटेज’ उपलब्ध आहे. घटनास्थळावरून ‘फॉरेन्सिक’ नमुने घेण्यात आले. आहेत; अंतिम अहवालानंतरचया दुर्घटनेत घातपात आहे कि नाही, हे निश्चित होईल, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.

संरक्षण विभागाकरता लागणार्‍या विस्फोटकांचे उत्पादन या आस्थापनात केले जाते. या आस्थापनामध्ये ३ हजार ४०० कामगार आहेत. ‘टी.एन्.टी. आणि ‘आरडीएक्स द्वारे कच्च्या मालापासून ‘हॅन्डग्रेनेट’साठीच्या ‘पॅनेट’ची निर्मिती येथे केली जाते. यासाठी ‘टी.एन्.टी. फ्लेस’ चाळत असतांना हा स्फोट झाला. स्फोटामुळे इमारत कोसळून ९ जणांचा घटनास्थळी मृत्यू झाला. या प्रकरणी भा.दं.वि. ३०४(१) अन्वये प्रशासनावर गुन्हा नोंदवण्यात आला असे या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात