महाराष्ट्र ताज्या बातम्या

हिंदवी स्वराज्याच्या वारसा स्थळांवर केवळ भगवाच फडकणार : सुधीर मुनगंटीवार

X : @therajkaran

सांगली/मुंबई

छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याची वारसास्थळे, गड किल्ले यावरचे अतिक्रमण निश्चित हटवले जाईल आणि हिंदवी स्वराज्याच्या वारसास्थळांवर केवळ भगवाच फडकलेला दिसेल, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य, वने व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतेच सांगली येथे केले.

ना. सुधीर मुनगंटीवार सांगली दौऱ्यावर आले असता, प्रतापगडाच्या पायथ्याचे अफजलखानाचे उदात्तीकरण करणारे अतिक्रमण हटविल्याबद्दल श्रीशिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलनाच्या वतीने त्यांचा चांदीची गदा देऊन सत्कार करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुरेश खाडे आणि श्रीशिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलनाचे निमंत्रक माजी आमदार नितीन शिंदे यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला.

ना. सुधीर मुनगंटीवार यांनी पुढे सांगितले की, औरंगजेब आणि अफजलखानासारखे परके आक्रमक आणि क्रूर अत्याचारी आमचे आदर्श कधीही होऊ शकत नाहीत. त्या क्रूर असुरांशी लढून हिंदवी स्वराज्याची पुनर्स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षणाकरता प्राणार्पण करणारे महाराणा प्रताप, राणी लक्ष्मीबाई हेच आमचे आदर्श आहेत. स्वराज्यशत्रूंचे उदात्तीकरण या देशात कधीही खपवून घेतले जाणार नाही. त्यामुळेच हिंदवी स्वराज्याची वारसास्थळे लवकरच अतिक्रमणमुक्त केली जातील आणि त्यावर भगवाच फडकलेला दिसेल, असे ते म्हणाले. माजी आमदार नितीन शिंदे यांनी प्रतापगड पायथ्याशी अफजलखानाचे जे उदात्तीकरण चालले होते, त्याविरोधात सातत्याने संघर्ष केला. मात्र मतपेटीचे लांगुलचालन करणाऱ्या तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले.

सांगलीतील प्रवीण कवठेकर यांनी अफजलखान वधाचे पोस्टर काढले होते, त्यांना तत्कालीन कॉन्ग्रेस सरकारने तुरुंगात टाकले होते, त्याची आठवण सांगत ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, मी त्यांच्या अटकेविरोधात तेव्हा आवाज उठवला होता.

काहींच्या मेंदूत शिरलेला अफजलखानाचा व्हायरस काढण्यासाठी वाघनखे परत आणणार : सुधीर मुनगंटीवार

प्रतापगडाच्या पायथ्याशी स्वराज्यशत्रू अफजलखानाचे उदात्तीकरण करणारे अतिक्रमण तर हटवले आहे. मात्र काहींच्या मेंदूत अफजलखानाचा व्हायरस शिरला आहे. तो काढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा काढण्यासाठी वापरलेली वाघनखे ब्रिटनहून परत आणणार आहे, असे ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात