महाराष्ट्र ताज्या बातम्या

हमीभाव, नाफेड–सीबीआय केंद्रांवर उत्तर अपुरे; विरोधक संतप्त, घोषणाबाजी करत सभात्याग — तीन वाजता अध्यक्षांची तातडीची बैठक

नागपूर – राज्यातील नाफेड व सीबीआयची हमीभाव खरेदी केंद्रे, तसेच शेतमाल आणि कापसाला योग्य हमीभाव मिळण्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर पणनमंत्री जयकुमार रावळ यांचे उत्तर समाधानकारक नसल्याचा आरोप करत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आज विधानसभेत जोरदार गदारोळ केला. उपप्रश्न विचारण्याची संधी न मिळाल्याने विरोधक संतप्त झाले आणि धिक्कार घोषणा देत सभात्याग केला. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा मुद्दा गंभीर असल्याचे सांगत “दुपारी ३ वाजता माझ्या दालनात बैठक घेऊ,” असे जाहीर केले. या प्रश्नावर सदस्यांची भावना अत्यंत तीव्र होती.

मुख्य मुद्दे पुढीलप्रमाणे: विजय वडेट्टीवार म्हणाले, “आयात शुल्क कमी का केले? सीसीआयची मर्यादा वाढवून काय साध्य होणार?”

बबनराव लोणीकर म्हणाले, “चार-चार लाखांची मागणी शेतकऱ्यांकडे अधिकारी करतात. पन्नास गावाला एक हमीभाव केंद्र हवे.”

प्रकाश सोळंके यांनी खरेदी केंद्रे ही “व्यापाऱ्यांच्या सोयीसाठीच चालतात,” असा आरोप केला. 

नाना पटोले यांनी उत्तरावर आक्षेप घेत “प्रश्न राखून ठेवा,” अशी आग्रही मागणी केली. त्यांनी पोटतिडकीने सांगितले, “दररोज आठ शेतकरी आत्महत्या करत आहेत.”

अनेक सदस्यांना उपप्रश्न विचारायचे होते, त्यामुळे ते अध्यक्षांच्या आसनासमोर जाऊन घोषणा देऊ लागले.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात