ताज्या बातम्या महाराष्ट्र

शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान करणाऱ्या उपनिबंधकाच्या चौकशीचे आदेश – माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या पाठपुराव्याला यश

7 दिवसांत चौकशी अहवाल सादर करा — महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

कल्याण : मागाठाणे 17 येथील उपनिबंधक अधिकारी संजय साळवे यांनी स्थानिक विकासकांच्या फायद्यासाठी संगनमताने मुद्रांक शुल्कात घोटाळा करून शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान केल्याचा गंभीर आरोप भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केला आहे. या तक्रारीची गंभीर दखल घेत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नोंदणी आणि मुद्रांक विभागाच्या महानिरीक्षकांना सात दिवसांत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

संजय साळवे मागाठाणे 17 येथे गेल्या दीड वर्षांपासून उपनिबंधक म्हणून कार्यरत आहेत. या काळात त्यांनी मालमत्ता नोंदणी प्रक्रियेत दस्तऐवजांचे चुकीचे मूल्यांकन करून आणि शासनाने ठरवलेल्या मुद्रांक शुल्कापेक्षा कमी शुल्क आकारून शासनाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान केले आहे, असा ठपका माजी आमदार पवार यांनी ठेवला आहे.

त्यांनी आपल्या तक्रारीत दस्त नोंदणी क्रमांक 2386, दिनांक 14 फेब्रुवारी 2025 असा ठोस पुरावाही सादर केला आहे. पवार यांनी आरोप केला की, संजय साळवे यांनी काही प्रकरणांमध्ये गरजू नागरिकांकडूनही अनधिकृत रक्कम घेतली असून, केंद्र व राज्य शासनाच्या मुद्रांक शुल्कात तफावत दाखवून ही रक्कम अपहारली आहे.

“ही बाब अतिशय गंभीर असून शासनाचे आर्थिक नुकसान या अधिकाऱ्याकडून वसूल केले जावे, तसेच उच्चस्तरीय चौकशीद्वारे यातील संपूर्ण तथ्ये उघडकीस आणावीत,” अशी मागणी पवार यांनी केली होती.

महसूलमंत्र्यांनीही या तक्रारीची तातडीने दखल घेत नोंदणी व मुद्रांक नियंत्रक महानिरीक्षकांना चौकशी करून सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती माजी आमदार नरेंद्र पवार यांनी पत्रकारांना दिली.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात