महाराष्ट्र ताज्या बातम्या

Pakistan Cricket : शहिदांचा अपमान! पाकिस्तानसोबत क्रिकेट म्हणजे मोदी सरकारचा देशद्रोह – पुण्यात आम आदमी पक्षाचा संतप्त आवाज, पाकिस्तानी क्रिकेटचा टी-शर्ट जाळून निषेध

पुणे : देशभरात पाकिस्तानविरोधी संताप असताना मोदी सरकार मात्र पाकिस्तानी क्रिकेटसमोर गुडघे टेकते आहे, असा आरोप आम आदमी पक्षाने आज पुण्यात केला. येत्या १४ सप्टेंबर रोजी दुबईत होणाऱ्या भारत–पाक सामना रद्द करण्याची मागणी करत शिवाजीनगर मेट्रो चौकात संतप्त कार्यकर्त्यांनी पाकिस्तानी क्रिकेटचा टी-शर्ट जाळून तीव्र निषेध व्यक्त केला.

काही महिन्यांपूर्वी जम्मू–काश्मीरमधील पहलगाम घाटी दहशतीने थरारली होती. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी २६ निष्पाप भारतीयांचा बळी घेतला. त्या शोकाकुल आठवणी अजूनही ताज्या असताना मोदी सरकार मात्र त्या दहशतवादी देशासोबत ‘एशिया कप’मध्ये खेळायला तयार होते, ही थेट शहिदांचा आणि देशभक्तीचा विटंबना असल्याचे आम आदमी पक्षाने स्पष्ट केले.

“ज्या दहशतवादी राष्ट्राने पहलगाममध्ये भारतीय २६ महिलांचे कुंकू पुसले, त्या देशासोबत क्रिकेट खेळण्यामागे मोदी सरकारची कोणती मजबुरी आहे? काही ठराविक कॉर्पोरेट हितसंबंध जपण्यासाठी देशप्रेमाला तिलांजली देणारे हे सरकार आम्ही कधीही मान्य करणार नाही. हा सामना म्हणजे थेट देशद्रोह आहे. आम्ही सर्व देशभक्त नागरिकांना आवाहन करतो की या लाजिरवाण्या सामन्याचा तीव्र निषेध करा, बहिष्कार घाला,” असा इशारा आम आदमी पक्षाने दिला.

या संतप्त आंदोलनात पक्षाचे कार्याध्यक्ष अजित फाटके पाटील, मुकुंद किर्दत, सुदर्शन जगदाळे, अभिजीत मोरे, सुरेखा भोसले, अनिकेत शिंदे, सुभाष कारंडे, रवीराज काळे, शितल कांडगावकर, प्रशांत कांबळे, रितेश निकाळजे, सुरेश भिसे, वैभव टेमकर, संग्राम पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले.

“शहिदांचा अपमान आम्ही सहन करणार नाही, पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणार मोदी सरकार लाजलं पाहिजे,” अशा घोषणांनी शिवाजीनगर मेट्रो चौक आज दणाणून गेला.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात