सिंधुदुर्ग
भाजप नेते निलेश राणेंकडून उद्धव ठाकरेंच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर टीका केली जात होती, मात्र अशाही परिस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील गांधी चौकात उद्धव ठाकरेंची सभा पार पडली. यावेळी सभेत बोलताना ठाकरेंनी भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटावर आगपाखड केली. या सभेत पंतप्रधान मोदीही त्यांच्या निशाण्यावर होते.
सरकारकडून नुसता घोषणांना पाऊस पडत आहे. मात्र दुष्काळात तेरावा महिना करणारं सरकार या देशाला नको आहे. प्रधानमंत्री स्वनिधी योजना पंतप्रधानांसाठी आहे का? पंतप्रधान मत्सनिधी योजनेचा सर्वाधिक लाभ गुजरातला दिला आहे. कोकणातील किती लोकांना हा लाभ मिळाला? अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर टीका केली.
कोकणाला सागर किनाला लाभला आहे. पाणबुडी पर्यटन प्रकल्पाला मी मुख्यमंत्री असताना मान्यता दिली होती. मात्र गद्दारी करून सरकार पाडलं गेलं, असं ठाकरे पुढे म्हणाले. मोदी सरकारचा एक रथ गावागावात फिरतोय. त्या रथाला गावकरी विरोध करत आहेत. या देशाचं नाव बदलून मोदी सरकार ठेवलं जात आहे. या देशाचं नाव मोदी सरकार आहे की भारत सरकार? असा सवालही ठाकरेंनी केला.
ठाकरेंचा राणेंवर हल्ला…
- आज कोंबडी चोरायची नाही तर कोंबडी खायचा दिवस आहे.
- रविवारी कोंबडी वडे खाल्लेच पाहिजे
- कोंबडीची पिसं तुम्हीच काढलीत.
- मी मोदींचा शत्रू नाही, आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही.
- माझ्या सभेत भाड्याची माणसं नसतात तर रक्ताची माणसं असतात.
युती सरकारने मुंबईतील गँगवॉर मोडून काढलं होतं. या तर सरकारमध्येच गँगवॉर सुरू झालंय. एक मिंधेची गँग, एक भाजपची गँग आणि एक गँगवॉर अदृश्य स्वरुपात आहे. तिसरी गँग ७० हजार कोटींच्या सिंधन घोटाळ्यात बुडाली आहे. त्यामुळे तिला डोकं वर काढायला जमत नाहीये.