महाराष्ट्र

Pune Election: AAP: “नक्कल नको, अस्सल आणा” – पुण्यासाठी आम आदमी पार्टीचे निर्धारपत्र


प्रामाणिक आणि इमानदार प्रतिनिधित्व आम आदमी पार्टी करेल

पुणे : दिल्ली आणि पंजाबमध्ये सत्तेत असलेल्या आम आदमी पार्टीने (आप) पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आपले निर्धारपत्र जाहीर करताना, “नक्कल नको, अस्सल आणा” असा थेट संदेश पुणेकरांना दिला आहे. भ्रष्टाचारमुक्त, जबाबदार आणि पारदर्शी प्रशासनासाठी बदल घडवूया, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

पुण्यात आम आदमी पार्टीचे ८५ उमेदवार निवडणूक रिंगणात असून, यातील बहुतांश उमेदवार सुशिक्षित युवक वर्गातील कार्यकर्ते असल्याचे पक्षाने स्पष्ट केले. हे निर्धारपत्र आज पुण्यातील पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत पक्षाचे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी जाहीर केले.

मुकुंद किर्दत म्हणाले, दिल्ली आणि पंजाबमध्ये राबवलेल्या दर्जेदार शाळा, उत्तम आरोग्य सेवा आणि महिलांसाठी मोफत बस प्रवास या योजनांचा पुण्यातही अवलंब केला जाईल.

पुणेकरांसाठी रोजगारनिर्मिती, दरडोई उत्पन्न वाढ आणि धोरणात्मक निर्णयांद्वारे आर्थिक सक्षमीकरण यावर भर देण्यात येणार आहे. महिलांसाठी मोफत बस प्रवास ही योजना दिल्ली-पंजाबच्या धर्तीवर पुण्यातही लागू केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

वाहतूक कोंडीमुळे होणारी वेळ, इंधन आणि मानसिक-शारीरिक थकवा थांबवण्यासाठी “३० मिनिटांत ऑफिस, ३० मिनिटांत घरी” ही संकल्पना राबवली जाईल. यासाठी मिसिंग लिंक रोड, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, ट्रॅफिक मॅनेजमेंट सुधारणा यांवर भर दिला जाईल.

सर्व सरकारी शाळा खाजगी शाळांच्या तोडीच्या बनवल्या जातील, दर्जेदार सुविधा व माफक शुल्कात शिक्षण, प्रत्येक ५०० मीटर अंतरावर मोफत प्राथमिक आरोग्य सेवा देणारे मोहल्ला क्लिनिक आणि  “महापालिका तुमच्या दारात” योजनेतून पारदर्शी पद्धतीने कागदपत्रे घरपोच दिले जातील, असे मुकुंद किर्दत यांनी सांगितले.  

प्रत्येक घराला पुरेसे पाणी, समाविष्ट गावांमध्ये मूलभूत सुविधांना प्राधान्य, रस्ते, पाणी योजनांसाठी वाढीव निधी, प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर पावले आणि भयमुक्त शहरासाठी विविध उपाययोजना राबवल्या जातील, असे आश्वासन मुकुंद किर्दत यांनी पक्षाच्या वतीने दिले.

पक्षाचे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांनी पुणेकरांच्या समस्यांची यादी वाचत भाजप-राष्ट्रवादी युतीवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, नागरिकांच्या करातून जमा होणारा पैसा योग्य ठिकाणी, पारदर्शी आणि जबाबदारीने खर्च केला जाईल.

या पत्रकार परिषदेला प्रवक्ते मुकुंद किर्दत, शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे, महिला अध्यक्ष सुरेखा भोसले, महासचिव अक्षय शिंदे, सुभाष कारंडे, सुनील सवदी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात