महाराष्ट्र ताज्या बातम्या

Raigad : रायगड जिल्ह्याच्या राजकारणात डोंबाऱ्याचा खेळ – राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते धनंजय देशमुख

महाड – रायगड जिल्ह्यातील राजकारणात सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे प्रवक्ते धनंजय देशमुख यांनी शिंदे गटाच्या आमदार महेंद्र दळवी यांना चोख प्रत्युत्तर दिले.

देशमुख म्हणाले, “खासदार सुनील तटकरे हे १९९२ पासून रायगड जिल्ह्याच्या जनतेचे लोकप्रतिनिधी आहेत. त्यांना वारंवार विजयी करून दिले आहे. ज्यांनी तटकरे साहेबांच्या पायाला हात लावून राजकारणात उभे राहिले, तेच आज त्यांच्यावर टीका करत आहेत. ही टीकेची मालिका कुठेतरी थांबवावी. अन्यथा भविष्यात याहून परखड शब्दांत उत्तर द्यावे लागेल.”

रोहा येथे आमदार दळवी यांनी केलेल्या टीकेवर बोलताना देशमुख म्हणाले, “हा डोंबाऱ्याचा खेळ थांबवला नाही, तर आमच्याकडे पुरेसा तथ्याधारित भंडार आहे. आम्हाला अलिबागच्या आमदारांच्या कौटुंबिक गोष्टींवर बोलायचे नाही, त्यांच्या पत्नीने दाखल केलेल्या ४९८ च्या खटल्यावर बोलायचे नाही, किंवा वीज वितरण कंपनीचे खांब चोरल्याच्या गुन्ह्यावरही बोलायचे नाही. पण जर वेळ आली, तर रोहेपुरतेच नव्हे तर अलिबागमध्येही राष्ट्रवादी काँग्रेस उत्तर द्यायला तयार आहे.”

देशमुखांनी पुढे इशारा दिला की, “अलिबागचे आमदार जर पुन्हा तटकरे साहेबांवर वैयक्तिक टीका करतील, तर त्यांना कठोर आणि तितक्याच परखड शब्दांत प्रत्युत्तर मिळेल.”

Avatar

Milind Mane

About Author

मिलिंद माने (Milind Mane) हे महाड येथील ज्येष्ठ पत्रकार असून कोकण विभागातील राजकीय विश्लेषणात त्यांचा हातखंड आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात