महाराष्ट्र ताज्या बातम्या

जुलै–ऑगस्टमधील आपदग्रस्त शेतकऱ्यांना Rs १,३३९ कोटींच्या मदत पॅकेजला मंजुरी – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील

मुंबई : राज्यात जुलै व ऑगस्ट २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या १९ लाख २२ हजार ९०९ शेतकऱ्यांच्या १५ लाख ४५ हजार २५० हेक्टरवरील शेतपिकाच्या नुकसानीपोटी एकूण ₹१,३३९ कोटी ४९ लाख २५ हजारांच्या मदतीस शासनमान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली.

यासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला असून, शेतकऱ्यांचे तातडीने पुनर्वसन व दिलासा मिळावा यासाठी ही मदत निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विभागनिहाय मंजूर मदत

अमरावती विभाग
अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील ७.८८ लाख शेतकरी व ६.५४ लाख हेक्टर क्षेत्र बाधित. नुकसान भरपाई म्हणून ₹५६५ कोटी ६० लाख ३० हजार मंजूर.

नागपूर विभाग
गोंदिया, भंडारा, गडचिरोली, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यातील ३७,६३१ शेतकरी व २१,२२४ हेक्टर क्षेत्र बाधित. मंजूर मदत ₹२३ कोटी ८५ लाख २६ हजार.

पुणे विभाग
कोल्हापूर जिल्ह्यातील ३६,५५९ शेतकरी व ८,८३५ हेक्टर क्षेत्र बाधित. मंजूर मदत ₹१४ कोटी २८ लाख ५२ हजार.

छत्रपती संभाजीनगर विभाग
हिंगोली, बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील १०.३५ लाख शेतकरी व ८.४८ लाख हेक्टर क्षेत्र बाधित. मंजूर मदत ₹७२१ कोटी ९७ लाख ८६ हजार.

नाशिक विभाग
नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव व अहिल्यानगर जिल्ह्यातील २४,६७७ शेतकरी व १२,१४९ हेक्टर क्षेत्र बाधित. मंजूर मदत ₹१३ कोटी ७७ लाख ३१ हजार.

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात