महाराष्ट्र ताज्या बातम्या

आपेगावमध्ये संत एकनाथ महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याचा प्रस्ताव; केंद्राकडे पाठपुरावा

Tourism Minister Shambhuraj Desai speaking in Maharashtra Assembly on Sant Eknath memorial project in Apegaon

मुंबई : पैठण तालुक्यातील आपेगाव येथे संत सृष्टी निर्माण प्रकल्प आणि संत एकनाथ महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला असून त्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येईल, अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत दिली.

अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, सदस्यांनी आपल्या मतदारसंघातील पर्यटन स्थळांच्या विकासासाठी प्रस्ताव सादर केल्यास राज्य सरकार त्यावर सकारात्मक विचार करेल.

दरम्यान, एसआरए योजनांमध्ये बोगस लाईट बिलांचा पुरावा म्हणून वापर करून झोपडपट्टी समाविष्ट केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून त्याबाबत माहिती घेऊन आवश्यक कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

तसेच एकमजली झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासासंदर्भात अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असेही देसाई यांनी सांगितले.

यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनीही सांस्कृतिक क्षेत्रातील विविध उपक्रमांची माहिती दिली. कोकणात इसवीसनपूर्व सुमारे २० हजार वर्षांपूर्वीची कातळ शिल्पे (Rock Art) आढळून आली असून त्यावर संशोधन आणि अभ्यासासाठी १५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

मुंबईतील बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे वस्तुसंग्रहालय उभारण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. तसेच वरळी आणि प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर आणि पु. ल. देशपांडे अकादमीच्या विकासानंतर एका वर्षात सुमारे एक हजार सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले असून एक लाखाहून अधिक प्रेक्षकांनी त्याचा लाभ घेतला, अशी माहिती शेलार यांनी दिली.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात