मुंबई

महाडमध्ये स्नेहल जगताप यांचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित – कोकणात पुन्हा नाद घुमणार!

महाड : कोकणातील राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा बळ मिळणार असून, स्नेहल जगताप या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)मध्ये प्रवेश करत आहेत. हा भव्य प्रवेश सोहळा एप्रिल महिन्यात महाड येथील चांदे क्रीडांगणावर पार पडणार असून, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.

विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर स्नेहल जगताप यांच्यासमोर राजकीय भविष्याचा प्रश्न निर्माण झाला होता. सुरुवातीला त्यांनी भाजपकडे वाटचाल केली, मात्र अपेक्षित पुनर्वसनाची हमी न मिळाल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतण्याचा निर्णय घेतला. या प्रवेशासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनील तटकरे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

महाडच्या माजी आमदार कै. माणिकराव जगताप यांच्या कन्या स्नेहल जगताप यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना (उद्धव ठाकरे गट)मध्ये प्रवेश करून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी 26,210 मतांनी पराभूत केले. पराभवानंतर जगताप यांनी भाजपशी चर्चा केली, परंतु ठोस आश्वासन न मिळाल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.

स्नेहल जगताप यांनी सह्याद्री अतिथीगृहात अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत प्रवेश निश्चित केला. त्यांच्या राजकीय पुनर्वसनाचा मार्ग मोकळा करण्यासाठी महामंडळातील राज्यमंत्रीपद तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

महाडच्या चांदे क्रीडांगणावर ऐतिहासिक सोहळा
महाडमधील चांदे क्रीडांगण हा ऐतिहासिक वारसा लाभलेला परिसर आहे. याच मैदानावर उद्धव ठाकरे यांनी स्नेहल जगताप यांचा शिवसेनेत प्रवेश घडवून आणला होता. आता त्याच ठिकाणी त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होत असल्याने हा सोहळा विशेष महत्त्वाचा ठरणार आहे. या वेळी मंत्री आदिती तटकरे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.

रायगडपासून तळ कोकणापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकदा आपली ताकद वाढवणार असून, कोकणात पक्षाचा “नाद” पुन्हा घुमणार असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगू लागली आहे.

Avatar

Milind Mane

About Author

मिलिंद माने (Milind Mane) हे महाड येथील ज्येष्ठ पत्रकार असून कोकण विभागातील राजकीय विश्लेषणात त्यांचा हातखंड आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
मुंबई

उद्धव सेनेच्या मुंबईतील राजकीय ताकदीपुढे भाजपची शरणागती: सिनेट निवडणूक पुढे ढकलली

Twitter : @vivekbhavsar मुंबई : शिवसेना पक्षाला मोठे खिंडार पाडून एकनाथ शिंदे यांना राज्याचे मुख्यमंत्री केल्यानंतर देखील मुंबईत शिवसेनेचा पराभव