ताज्या बातम्या महाराष्ट्र

राज्यात सीबीएसई बोर्ड, मग शिक्षण मंडळ बंद करणार का? – सुप्रिया सुळे

मुंबई – राज्य सरकार शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम लागू करत आहे, मग राज्य शिक्षण मंडळाचे काय होणार? मराठी भाषा आणि महाराष्ट्राच्या इतिहासाचे काय? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.

पत्रकार परिषदेत बोलताना सुळे म्हणाल्या की, सीबीएसई अभ्यासक्रमात मराठीचा किती टक्का असेल? महाराष्ट्राचा इतिहास त्यात असेल का? याबाबत सरकारकडे कोणतीही स्पष्टता नाही. शिक्षण मंडळ बंद करण्याचा विचार आहे का? असा प्रश्नही त्यांनी केला.

राज्यात वाढत्या गुन्हेगारीवरही त्यांनी सरकारला धारेवर धरले. “सध्या महाराष्ट्राचा गृहमंत्रालय झोपले आहे का?” असा टोला लगावत प्रशांत कोरटकर प्रकरणात सरकारने केंद्राची मदत घ्यावी, अशी मागणी केली. तसेच बीड आणि परभणीतील घटनांवर सरकारच्या भूमिकेवरही त्यांनी टीका केली.

सरकारने औरंगजेबाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी गुंतवणुकीच्या समस्यांवर आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अधिक लक्ष द्यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात