महाराष्ट्र ताज्या बातम्या

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचे 31,628 कोटी रुपयांचे पॅकेज – मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

सर्व निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना दिलासा; शिंदे–पवार यांचीही दिलासादायी भूमिका

मुंबई: राज्यातील अतिवृष्टीमुळे 29 जिल्हे, 253 तालुके आणि 2,059 मंडलांतील शेतकरी पूरग्रस्त झाले आहेत. या बळिराजाला पुन्हा उभारी देण्यासाठी राज्य सरकारने 31,628 कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह मंत्रालयात संयुक्त पत्रकार परिषदेत ही महत्त्वपूर्ण घोषणा केली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “खरडून गेलेल्या जमिनीसाठी हेक्टरी 47 हजार रुपये आणि नरेगा योजनेंतर्गत हेक्टरी 3 लाख रुपये दिले जातील.” तसेच, पायाभूत सुविधांच्या पुनर्बांधणीसाठी दहा हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.

मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यात 68 लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून, 60 लाख शेतकरी बाधित झाले आहेत. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी “सर्व निकष बाजूला ठेवले जातील,” असे त्यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारकडे लवकरच मदतीसाठी सविस्तर प्रस्ताव पाठवला जाणार आहे.

राज्यातील 45 लाख शेतकऱ्यांनी पिक विमा उतरविला आहे. केंद्रिय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी विमा कंपन्यांशी बोलणी करून सुमारे 5,500 कोटी रुपयांची विमा रक्कम शेतकऱ्यांना मिळवून देण्याचे आश्वासन दिले असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की –
• विहिरींच्या नुकसानीसाठी 100 कोटी रुपयांची नुकसानभरपाई दिली जाईल.
• कोरडवाहू शेतीसाठी हेक्टरी 18,500 रुपये,
• हंगामी बागायतीसाठी 27,000 रुपये,
• बागायती शेतीसाठी 32,500 रुपये,
तर रब्बी पिकांसाठी बियाण्यांसाठी 10,000 रुपये देण्यात येतील.
• दूध उत्पादकांना जनावरांसाठी भरपाई, आणि
• धरणातील गाळ वापरून जमिनी पुन्हा उपजाऊ करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकार शेतकऱ्यांना पुन्हा उभे करेल, असा विश्वास व्यक्त केला. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही. मदत देताना कोणतेही निकष आड येऊ देणार नाही.”

पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “आजवर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेले हे सर्वात मोठे मदत पॅकेज आहे.” त्यांनी सांगितले की, राज्यातील अनेक साखर कारखाने स्वयंस्फूर्तीने प्रत्येकी एक कोटी रुपयांचे सहाय्य देत आहेत. “हा सामाजिक बांधिलकीचा विषय आहे,” असेही ते म्हणाले.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात