ताज्या बातम्या महाराष्ट्र

स्वाभिमानी शेतकरी संघटना लोकसभेच्या 6 जागा लढवणार!

कोल्हापूर

भाजपने पक्ष फोडले आणि महाविकास आघाडीने शेतकऱ्यांविरोधात निर्णय घेतल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आगामी लोकसभा निवडणुकीत 6 जागा लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. स्वत: राजू शेट्टी यांनी माध्यमाशी बोलताना याची माहिती दिली.

गेल्या काही काळात काही मतदारसंघाकडे लक्ष केंद्रीय केलं असून या जागांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा जम बसला आहे. महाराष्ट्रभरात उमेदवार देणं आर्थिकदृष्ट्या आणि पुरेसे कार्यकर्ते नसल्याने शक्य नाही, त्यामुळे लक्ष केंद्रीत केलेल्या सहा जागा लढवणार असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली.

यादरम्यान भाजप किंवा महाविकास आघाडीने चर्चेसाठीही येऊ नये असं शेट्टी यावेळी म्हणाले. आम्ही अडीच वर्षांपूर्वीच आमची भूमिका मांडली आहे. त्यामुळे आम्हाला शक्य तसं काम सुरू ठेवण्याचा निर्धार शेट्टी यांनी केला.

कोणत्या मतदारसंघात ठोकणार शड्डू
हातकणंगले
माढा
कोल्हापूर
सांगली
बुलढाणा
परभणी

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात