ताज्या बातम्या महाराष्ट्र

निरगुडे मागासवर्गीय आयोग असताना शिंदे आयोगाची गरजच काय? नाना पटोलेंचा सवाल

नागपूर नागपूरच्या हिवाळी अधिवेशानाकडे राज्यातील शेतकरी मोठी आशा लावून बसला आहे. वर्षभर सातत्याने नुकसानच होत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. भाजपा सरकारच्या शेतकरी विरोधी मानसिकतेमुळे दररोज 14 आत्महत्या होत आहेत. सरकार आजतरी शेतकऱ्यांना भरीव मदत जाहीर करेल अशी अपेक्षा होती परंतु सरकारने आज चर्चेला उत्तर दिले नाही. मुख्यमंत्री शुक्रवारी निवेदन करतील असे सांगण्यात आले. मदतीची […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

मध्य प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री मोहन यादव यांच्यावर तब्बल 9 कोटींचं कर्ज

भोपाळ मोहन यादव यांची मध्य प्रदेशच्या नवे मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे अखेर मध्य प्रदेशला त्यांचा नवा मुख्यमंत्री मिळाला आहे. मात्र मोहन यादव राज्याच्या मुख्यमंत्रिपदी निवडून येतील याचा अंदाज क्वचितच कोणी बांधला असेल. आता लोक त्यांच्याबाबत जाणून घेत आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्याबाबत एक वित्तीय बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्र्यांवर कोट्यवधींचं […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

काँग्रेसचा सोमवारी नागपूर विधानभवनावर ‘हल्लाबोल’ मोर्चा

X: @therajkaran नागपूर: राज्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत आहे, शेतमालाला भाव नाही, सरकार मदतीच्या कोरड्या घोषणा करत आहे, तरुणांना नोकऱ्या नाहीत, आरक्षणावर निर्णय घेतला जात नाही. ड्रग माफियांचा सुळसुळाट झाला आहे पण भाजपाप्रणित शिंदे सरकार जनतेच्या या मुलभूत प्रश्नांकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. जनतेला वा-यावर सोडून विदर्भात फक्त पर्यटनाला आलेल्या बेजबाबदार महाराष्ट्रविरोधी भाजपा व फुटीरांच्या सरकारला […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार असंवेदनशील; बाळासाहेब थोरात यांचा हल्लाबोल

X: @NalavadeAnant नागपूर: शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार असंवेदनशील आहे, याचा प्रत्यय आज सभागृहात आला. अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रात शेती पिकांचे प्रचंड नुकसान झालेले असून या प्रश्नांवर चर्चा करावी अशी मागणी विरोधकांनी स्थगन प्रस्तावाद्वारे केली. मात्र सरकारने चर्चा तर सोडा साधे निवेदन सुद्धा केले नाही, असा घणाघाती आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

आमदार अपात्रता प्रकरण : ‘त्या’ तिघांवर कारवाई नाही, उद्धव ठाकरे गट उद्या कोर्टाचं दार ठोठावणार

Twitter : @therajkaran मुंबई एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde Sena) शिवसेनेतील विधान परिषदेचे आमदार अपात्रता (disqualification of MLAs) प्रकरणात मोठी घडामोड पाहायला मिळत आहे. विधान परिषदेचे सदस्य विप्लव बजोरिया, मनिषा कायंदे आणि निलम गोऱ्हे यांच्यावर कारवाईबाबत विधीमंडळात हालचाल होतं नसल्यामुळे उद्धव ठाकरे गट (UBT Shiv Sena) कोर्टाचे दरवाजे ठोठावणार असल्याची माहिती समोर आली आहे. हायकोर्टात ठाकरे […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

इंडिया आघाडीत नाराजीचा सूर? उद्या होणारी बैठकही रद्द

नवी दिल्ली मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर इंडिया आघाडीत धुसफूस पाहायला मिळत आहे. उद्या दिल्लीत इंडिया आघाडीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या बैठकीत समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह आघाडीतील काही प्रमुख नेते अनुपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात होते. […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

देशात मोदींविरोधी लाट? काँग्रेसच्या दावा अन् आकडेवारींचं सत्य, पाहा स्पेशल रिपोर्ट

काँग्रेसने केलेल्या Anti incumbency चा दावा फोल; 2018 आणि 2023 ची आकडेवारी काय सांगते? नवी दिल्ली विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेशाची स्वप्न पाहणाऱ्या काँग्रेसला छत्तीसगड आणि राजस्थानातील आपली सत्ताही कायम ठेवता आली नाही आणि पराभवाचा सामना करावा लागला. मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेसकडून Anti incumbency म्हणजेच सत्ता विरोधी लाट असल्याचा दावा केला जात होता. मात्र […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

नेमकं कोणाचं अपयश? छत्तीसगडमध्ये काँग्रेस का हरली, ही आहेत कारणं

भाजपने छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या तुलनेत चांगली आघाडी मिळवत सत्तास्थापनेकडे वाटचाल सुरू केली आहे. अशा परिस्थितीत छत्तीसगडमधील काँग्रेसची बोट बुडण्याच्या कारणांची राजकीय वर्तुळात चर्चा केली जात आहे. काय आहेत ती कारणं, जाणून घेऊया.

ताज्या बातम्या राष्ट्रीय

गेहलोतांचा अहंकार की अंतर्गत कलह, राजस्थानमध्ये काँग्रेसचा पराभव का झाला? ही आहेत ५ कारणं

राजस्थानमध्ये काँग्रेसचा मोठा पराभव (congress lost in Rajasthan) झाला आहे. गेल्या ३० वर्षांपासून सुरू असलेली परंपरा पुन्हा एकदा कायम असून काँग्रेसनंतर भाजप पुन्हा सत्तेत येत आहे. मुख्यमंत्री गेहलोत यांनी दिलेल्या घोषणांकडे जनतेने दुर्लक्ष केल्याचं दिसत असून भाजपला सत्तेत बसवलं आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार, राजस्थानात १९९ पैकी भाजपला ११५, काँग्रेसला ७० आणि इतर पक्ष १४ जागांवर आघाडीवर […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

मध्य प्रदेशात पुन्हा कमळ; ही आहेत भाजपच्या यशाची ५ कारणं

गेल्याच आठवड्यात आपल्या मूळगावातील मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले होते की, मी मध्य प्रदेशात भारतीय जनता पक्षाची सत्ता पुन्हा आणेन. काँग्रेसनेही मध्य प्रदेशात सत्ता स्थापन करता यावी यासाठी कसोशीने प्रयत्न केले होते. राहुल गांधी, प्रियांका गांधी यांनी मध्य प्रदेशात चांगला प्रचारही केला होता. मध्य प्रदेशात भाजपच्या यशामागील कारण नेमकं काय आहे? मध्य प्रदेशात […]