‘स्वातंत्र्यानंतरही आम्ही भटकेच का?’ – उचल्याकार लक्ष्मण गायकवाडांचा साहित्य संमेलनातून आक्रोश
सातारा : छत्रपती शाहू महाराज साहित्य नगरीत सुरू असलेल्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक ‘उचल्याकार’ लक्ष्मण गायकवाड यांनी विमुक्त-भटक्या समाजाच्या वेदनांना शब्द देत सभागृह अक्षरशः स्तब्ध केले. “बेरड, रामोशी, कैकाडी, मसणजोगी, नंदीबैलवाले यांसह अनेक जाती छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे मावळे होतो. रुप पालटून हेरगिरी करणारे खरे ‘सीआयडी’ आम्हीच […]



