ताज्या बातम्या महाराष्ट्र

मोठी बातमी! नागपुरातील काँग्रेसच्या स्थापना दिन सोहळ्याला प्रियंका आणि सोनिया गांधी अनुपस्थितीत!

नवी दिल्ली नागपूरात आज काँग्रेसचा १३९ स्थापना दिन सोहळा मोठ्या दिमाखात साजरा केला जाणार आहे. याची सर्व तयारी झाली असून देशभरातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते या सोहळ्याला उपस्थित राहणार आहे. दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रियंका गांधी आणि सोनिया गांधी नागपूरातील काँग्रेसच्या स्थापना दिन सोहळ्याला अनुपस्थितीत राहणार असल्याची बातमी समोर आली आहे. दिल्लीत स्थापनादिन […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

प्रकाश आंबेडकर प्रतीक्षेत, खरगेंकडून अद्याप कोणताही निरोप नाही

नागपूर वंचित बहुजन आघाडी ही इंडिया आघाडीत येण्याबाबत शरद पवार सकारात्मक असल्याचं दिसून येत आहे. काल 27 डिसेंबर रोजी अमरावती येथे शरद पवार माध्यमाशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, इंडिया आघाडीच्या बैठकीत मी मल्लिकार्जुन खरगे यांना प्रकाश आंबेडकरांशी संपर्क साधून त्यांच्यासह निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी प्रयत्न करायला हवं, असं सांगितलं आहे. दरम्यान वंचित बहुजन आघाडीला […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

सर्वाधिक परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला पुरावा!

मुंबई 2022-23 या आर्थिक वर्षांत 1,18,422 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक करुन महाराष्ट्र क्रमांक 1 वर आला होता. 2023-24 च्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून 2023) या कालावधीत 36,634 कोटी रुपये परकीय गुंतवणूक आल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाज माध्यमातून दिली आहे. आता 2023-24 च्या दुसर्‍या तिमाहीची (जुलै ते सप्टेंबर 2023) सुद्धा आकडेवारी आली […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

साऊथचे सुपरस्टार आणि DMDK नेता विजयकांत यांचं कोविडमुळे निधन

चेन्नई कोरोनामुळे एक ज्येष्ठ नेत्याचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार आणि डीएमडीके नेता विजयकांत यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. देसिया मुरपोक्कु द्रविड कडगमचे नेता आणि जुन्या काळातील प्रसिद्ध तमिळ अभिनेता विजयकांत यांचं गुरुवारी चेन्नईच्या एका रुग्णालयात निधन झालं. ते ७१ वर्षांचे होते. मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, राम मंदिर उद्घाटनात उद्धव ठाकरेंना आमंत्रण नाही, कारण…

मुंबई आधी काँग्रेस त्यानंतर भाजप, नंतर शिवसेना आणि वर्षभरापूर्वी शिंदे गटात सामील झालेले कृष्णा हेगडे यांनी संजय राऊतांना चुकीचं ठरवलं आहे. याशिवाय अयोध्या राम मंदिरात उद्धव ठाकरेंना आमंत्रण नसल्याचं समर्थन केलं आहे. माजी आमदार आणि शिंदे गटाचे प्रवक्ते कृष्णा हेगडे म्हणाले, दीड वर्षात संजय राऊतांनी सामनात जे काही लिहिलं ते चुकीचं ठरलं आहे. उद्धव ठाकरे […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

मणिपूर ते मुंबई, 6200 किमीचा प्रवास…राहुल गांधींच्या भारत जोडोचं दुसरं पर्व ‘भारत न्याय यात्रा’

X : @therajkaran नवी दिल्ली काँग्रेसकडून 14 जानेवारी ते 20 मार्चपर्यंत भारत न्याय यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. या यात्रेला मणिपूर ते मुंबईपर्यंत असेल. काँग्रेस महासचिव के.सी. वेणुगोपालने याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, भारत न्याय यात्रा अधिकतर अंतर बसने पार करणार आहे. काही ठिकाणी पदययात्रा केली जाईल. भारत न्याय यात्रा ही आसाम, पश्चिम बंगाल, […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

लोकसभेच्या जागावाटपावरुन एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गटात रस्सीखेच

X : @therajkaran मुंबई पक्षात बंड करून नवी चूल पेटवली खरी पण लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरुन एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गटात जुंपण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याची सुरुवात आताच सुरू झाली आहे. लोकसभेच्या 48 जागांपैकी भाजप, शिंदे गट आणि पवार गटामध्ये कोणाला किती जागा मिळणार यावरुन पडद्यामागे रस्सीखेच सुरू झाली आहे. अजित पवार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘है तैयार हम ‘ 28 डिसेंबरच्या महारॅलीसाठी नागपूरची ऐतिहासिक भूमी सज्ज

नागपूर देशातील लोकशाही केंद्र शासनाच्या दडपशाही धोरणामुळे धोक्यात आली आहे. संविधान संपविण्याचा घाट घालण्याचे काम सुरू आहे. अशा दडपशाही धोरणामुळे देशातील गंभीर बनलेल्या महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्नाकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अत्याचारी, दडपशाही वृत्तीला संपविण्यासाठी व भ्रष्टाचार मुक्त, अत्याचार मुक्त, महागाई मुक्त भारताच्या नवनिर्मितीसाठी काँग्रेस पक्ष तयार आहे. त्यासाठी आम्ही सर्व तयार असून ‘ […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

अमोल कोल्हेंनी शिवनेरीच्या पायथ्याशी फुंकलं रणशिंग, शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा घेऊन बारामतीकडे कूच

पुणे शेतकऱ्याला न्याय मिळावा यासाठी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते अमोल कोल्हे यांनी शिवनेरी ते पुणे असा शेतकरी आक्रोश मोर्चा काढला आहे. खा. कोल्हे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला असून शिवनेरीपासून या मोर्चाची सुरुवात झाली. कांद्यावरील निर्यात बंदी, दुधाचे पडलेले दर या मुद्द्यावर चर्चा व्हायला हवी याची मागणी केल्याने संसदेतून अमोल कोल्हे आणि सुप्रिया […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

हरिभाऊ राठोडांचा ‘तो’ फॉर्म्युला मराठा आरक्षणाचा वाद सोडवणार? जरांगे पाटीलही सकारात्मक?

मुंबई मराठा समाजाला ओबीसीमध्ये 9 टक्के आरक्षण देण्याचा ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी दिलेला फॉर्म्युला मनोज जरांगे पाटील यांनी फेटाळल्याची चर्चा सुरू असताना आता जरांगे पाटील याबाबत सकारात्मक असल्याचं दिसून येत आहे. सध्या जरांगे पाटील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. राठोड यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी एक […]