महाराष्ट्र ताज्या बातम्या

“अर्थसंकल्पीय अंदाजांचे पुनर्विलोकन आणि प्रभावी नियंत्रण यासाठी अंदाज समितीची भूमिका” या विषयावर होणार सखोल विचारमंथन

मुंबई: भारताच्या संसदेतील अंदाज समितीच्या कार्यारंभाला ७५ वर्षे पूर्ण होत असून, या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त २३ व २४ जून २०२५ रोजी विधान भवन, मुंबई येथे “संसद आणि राज्यांच्या अंदाज समित्यांची राष्ट्रीय परिषद” आयोजित करण्यात आली आहे.

या दोन दिवसीय परिषदेचे उद्घाटन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली तर राज्यसभेचे उपसभापती हरिवंश सिंह यांच्या उपस्थितीत होणार आहे.

या वेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, लोकसभेच्या अंदाज समितीचे प्रमुख डॉ. संजय जयस्वाल आणि महाराष्ट्र विधिमंडळाच्या अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर उपस्थित राहणार आहेत.

या परिषदेमध्ये
“प्रशासकीय कार्यक्षमतेसाठी व शासकीय खर्चात कार्यक्षमता आणि अर्थसंकल्पीय अंदाजांवर प्रभावी नियंत्रण यासाठी अंदाज समितीची भूमिका” या विषयावर सखोल चर्चा व विचारमंथन होणार आहे.

या परिषदेत संसद तसेच सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या अंदाज समित्यांचे प्रमुख आणि सदस्य सहभागी होणार असून, महाराष्ट्र विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य आणि महाराष्ट्रातील संसद सदस्य देखील परिषदेला उपस्थित राहणार आहेत.

अंदाज समित्यांच्या शिफारसी प्रशासनातील पारदर्शकता आणि कार्यक्षमतेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात.
या परिषदेनंतर २४ जून २०२५ रोजी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या उपस्थितीत वार्ताहर परिषद आयोजित करण्यात येणार आहे.

या ऐतिहासिक परिषदेमुळे जानेवारी २०२४ मधील ८४ वी अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद, उप राष्ट्रपती जगदीप धनखड यांचे जुलै २०२४ मधील मार्गदर्शन, तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते ३ सप्टेंबर २०२४ रोजी पार पडलेला विधानपरिषद शतक महोत्सव ग्रंथप्रकाशन सोहळा या मालिकेतील आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून ही परिषद नोंदवली जाणार आहे.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात