ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

धारावीत गौतम अदानींविरोधात आज ठाकरे गटाचं शक्तिप्रदर्शन

मुंबई

धारावी बचावच्या नाऱ्यासह शिवसेना उद्धव ठाकरे गट आज शनिवारी धारावीत भव्य मोर्चा काढणार आहेत. स्वत: उद्धव ठाकरे यांनी मोर्च्याचं नेतृत्व करण्याची घोषणा याआधीच केली आहे. धारावीमध्ये मोठ्या संख्येने पोस्टर्स लावले आहेत.

ठाकरे गटाचे नेता आणि माजी आमदार बाबुराव माने यांनी शुक्रवारी मीडियाशी बोलताना सांगितलं की, हा मोर्चा धारावी टी जंक्शनपासून सुरू होऊन अडाणींच्या कार्यालयापर्यंत असेल. शनिवारी निघणारा मोर्चा हा विराट असेल ज्यात दीड ते दोन लाख लोक सामील होतील, असा दावा त्यांनी यावेळी केला. धारावीतील प्रत्येक घर या मोर्चात सहभागी होईल, असंही म्हटलं जात आहे.

धारावी बचाव समितीने सांगितलं की, उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात धारावीच्या रहिवाशांना ४०० चौ.फुटाचं घर देण्याचा प्रस्ताव करण्यात आला होता. मात्र तेव्हा एसआरएकडून विकासकांना इतकी सवलत देण्यात आली नव्हती. जितका फायदा आणि सवलत अदानींना दिली जात आहे. यासाठी आता धारावीच्या रहिवाशांना ५०० चौ. फुटांचं घर मिळायला हवं.

धारावी बचाव समितीची अशीही मागणी आहे की, धारावनीचा पुनर्विकास अदानी किंवा इतर कोणी खासगी उद्योग समूहाकडून नाही तर सरकारी संस्था म्हाडाकडून करवून घ्यावी. धारावीत ज्यांचा व्यवसाय आहे, त्यांना त्याच ठिकाणी व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून द्यावी. धारावीत कुंभारवाडा आणि अन्य व्यवसाय वर्षानुवर्षांपासून सुरू आहेत. त्यांचं पुनर्वसन तेथेच केलं जावं. धारावीचं पुन्हा सर्वेक्षण करावं आणि त्याच्या आधारावर लोकांना घरं दिली जावीत.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात