ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

उद्धव ठाकरेंचे निष्ठावंत रवींद्र वायकर शिंदे गटात; ईडीच्या भीतीने पक्षांतर केल्याची चर्चा

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात पक्षांतराला उधाण आल्याचं दिसत आहे. उद्धव ठाकरे यांचे निष्ठावंत मानले जाणारे रवींद्र वायकर यांनी अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. ईडीच्या भीतीने त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. रवींद्र वायकर जोगेश्वरी विधानसभा जागेवरुन चार वेळा आमदार राहिले आहेत.

वायकर यांच्याविरोधात ईडीचा तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जोगेश्वरीतील पालिकेच्या भूखंडावरील क्लब आणि पंचतारांकित हॉटेलवरुन त्यांच्या विरोधात कारवाई सुरू आहे. जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडलगत जमिनीचा उपयोग खेळ आणि मनोरंजनासाठी करणं अपेक्षित होतं. मात्र या जमिनीवर पंचतारांकित हॉटेल उभारण्यात आलं. जानेवारी आणि जुलै २०२१ दरम्यान कथितपणे बीएमसीची फसवणूक करण्याच्या आरोपाखाली प्रकरण दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या हॉटेलवरील कारवाईवर सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यात मुंबई महानगरपालिकेने वायकर यांच्या बाजूने प्रतिक्षापत्र सादर केले तेव्हाच वायकर हे शिंदे गटात प्रवेश करणार हे स्पष्ट झाले होते. पत्नी आणि आपल्याला अटक होणार या भीतीने गेले काही दिवस वायकर अस्वस्थ असल्याची माहिती आहे. दुसरीकडे आलिबागजवळ उद्धव ठाकरे कुटुंबीय आणि वायकर यांनी बेकायदेशीरपणे बंगले उभारण्याचा व त्यातून आर्थिक फायदा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केल होता. यावरुन सोमय्या यांनी वायकर आणि ठाकरेंविरोधात ईडीसह अनेक ठिकाणी तक्रारीही केल्या होत्या.

रवींद्र वायकर एक दिवसाआधीच उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठकीत दिसले. यावेळी मुंबई उत्तर पश्चिम जागेवरुन चर्चा करण्यात आली आणि दुसऱ्याच दिवशी रविवारी वायकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन पक्षांतर केलं.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात