महाराष्ट्र ताज्या बातम्या

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांच्या धाराशिव दौऱ्यामुळे शिंदे सावध; पालकमंत्री सरनाईकांसह उद्याच दौरा

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येत्या दोन दिवसांत मराठवाड्यातील विशेषतः धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांचा पाहणी दौरा करणार असल्याची घोषणा केली. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सावध झाले असून, त्यांनी परिवहन मंत्री व जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह बुधवारी धाराशिव जिल्ह्याचा दौरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठाकरे यांनी आपल्या शिवसैनिकांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, पूरग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मदत पोहोचवावी आणि त्यांच्या बिकट अवस्थेवर तातडीने कार्यवाही व्हावी. दौऱ्यादरम्यान ठाकरे थेट शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांचे प्रश्न व अडचणी जाणून घेणार आहेत. तसेच शिवसेनेच्या वतीने १२,५०० कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. यात अन्नधान्य, पाणी व इतर गरजेच्या वस्तूंचा समावेश असेल.

दरम्यान, उपमुख्यमंत्री शिंदे आणि पालकमंत्री सरनाईक उद्याच धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी करणार आहेत. तेथे नागरिकांना सुरक्षिततेबाबत आवश्यक सूचना देऊन जिल्हा प्रशासनाला परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मार्गदर्शन करतील. शिंदे यांचे म्हणणे आहे की, सरकार आणि कार्यकर्ते जनतेच्या संकटात मदतीसाठी कटिबद्ध आहेत, तर विरोधक अजूनही केवळ परिस्थितीचे निरीक्षण करण्यात व्यस्त आहेत.

धाराशिव दौऱ्याला राजकीय महत्त्वही लाभले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गेल्या काही महिन्यांपासून मोर्चेबांधणी करत असून, पूरग्रस्त भागाच्या भेटीद्वारे ते शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. दुसरीकडे शिंदे गट सरकारची तत्परता आणि कार्यकर्त्यांची सक्रियता दाखवून देण्याच्या प्रयत्नात असल्याचे स्पष्ट होत आहे.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात